- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एआय आधारित ‘फेशियल रिकग्निशन सिस्टिम'(एफआरएस)लागू करण्याचा प्रस्ताव ‘सीआयएसएफ’ने दिला आहे.या प्रणालीमुळे प्रवाशांचा प्रवास केवळ सुलभच होणार नाही,तर विमानतळाची सुरक्षा व्यवस्थाही अभेद्य होणार असल्याने विमानतळावरील लांबलचक रांगा,कागदपत्रे तपासण्याचा कंटाळवाणा प्रवास आणि सुरक्षेचा ताण आता लवकरच इतिहासजमा होणार आहे.सदरची अत्याधुनिक प्रणाली प्रवाशांच्या चेहऱ्याचे स्कॅनिंग करेल.विशेष म्हणजे,हे सॉफ्टवेअर देशभरातील पोलिस आणि गुन्हेगारी रेकॉर्डच्या डेटाबेसशी जोडलेले असेल. विमानतळावर प्रवेश करताच संशयित व्यक्ती किंवा गुन्हेगारांची ओळख पटवणे यामुळे सोपे होणार आहे.या प्रणालीसाठी विमानतळावर नवीन कॅमेरे बसवण्याची फारशी गरज भासणार नाही.सध्या असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये केवळ एआय सॉफ्टवेअर अपडेट करून ही यंत्रणा कार्यान्वित करता येईल.यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे.दिल्ली,मुंबई आणि बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये आधीच ‘डिजीयात्रा’ ॲपद्वारे ही सुविधा दिली जात आहे. नागपूरमध्येही ही यंत्रणा आल्यास प्रवाशांना कागदपत्रे न दाखवता केवळ चेहऱ्याच्या स्कॅनिंगवर प्रवेश मिळेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने नागपूर विमानतळ आता जागतिक दर्जाच्या सुरक्षा मानकांशी जोडले जाणार आहे.
- Advertisement -

