Wednesday, June 24, 2026
Homeनागपूरआता चेहऱ्याचे स्कॅनिंग करून होणार विमानतळावर प्रवेश..

आता चेहऱ्याचे स्कॅनिंग करून होणार विमानतळावर प्रवेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एआय आधारित ‘फेशियल रिकग्निशन सिस्टिम'(एफआरएस)लागू करण्याचा प्रस्ताव ‘सीआयएसएफ’ने दिला आहे.या प्रणालीमुळे प्रवाशांचा प्रवास केवळ सुलभच होणार नाही,तर विमानतळाची सुरक्षा व्यवस्थाही अभेद्य होणार असल्याने विमानतळावरील लांबलचक रांगा,कागदपत्रे तपासण्याचा कंटाळवाणा प्रवास आणि सुरक्षेचा ताण आता लवकरच इतिहासजमा होणार आहे.सदरची अत्याधुनिक प्रणाली प्रवाशांच्या चेहऱ्याचे स्कॅनिंग करेल.विशेष म्हणजे,हे सॉफ्टवेअर देशभरातील पोलिस आणि गुन्हेगारी रेकॉर्डच्या डेटाबेसशी जोडलेले असेल. विमानतळावर प्रवेश करताच संशयित व्यक्ती किंवा गुन्हेगारांची ओळख पटवणे यामुळे सोपे होणार आहे.या प्रणालीसाठी विमानतळावर नवीन कॅमेरे बसवण्याची फारशी गरज भासणार नाही.सध्या असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये केवळ एआय सॉफ्टवेअर अपडेट करून ही यंत्रणा कार्यान्वित करता येईल.यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे.दिल्ली,मुंबई आणि बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये आधीच ‘डिजीयात्रा’ ॲपद्वारे ही सुविधा दिली जात आहे. नागपूरमध्येही ही यंत्रणा आल्यास प्रवाशांना कागदपत्रे न दाखवता केवळ चेहऱ्याच्या स्कॅनिंगवर प्रवेश मिळेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने नागपूर विमानतळ आता जागतिक दर्जाच्या सुरक्षा मानकांशी जोडले जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!