- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-प्रशासनाने अमलात आणलेल्या ‘घटना तिथे नोंद’ प्रणाली मुळे अनेक ग्रामपंचायतीवरील जन्म-मृत्यू नोंद करून प्रमाणपत्र देण्याच्या कार्याचा बोझा कमी झाला आहे.पूर्वी १९३७ ते १९५७ साली कोतवाल पंजीद्वारे जन्म-मृत्यू नोंदी होत होत्या.त्यानंतर सन १९५७ ते १९६९ मध्ये जन्म-मृत्यू नोंद करण्याचे अधिकार जनपथ सभेला देण्यात आले.जन्म मृत्यू अधिनियम १९६९ नुसार ग्रामसेवकाला निबंधकाचा दर्जा देण्यात येऊन ग्रामपंचायत मार्फत जन्म-मृत्यू नोंद व दाखले जनतेस देण्यात येत होते.
सन १९६९ ते २०१७ पर्यंत जन्म मृत्यू नोंद करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीकडे होते.त्यात प्रशासनाकडून २०१७ ला (सीआरएस) नागरी नोंदणी प्रणाली सुरू करण्यात आली.परंतु या प्रणालीत सन २०२४ पर्यंत आयडी तयार झाल्या नसल्याने जन्म मृत्यू नोंदीचे अधिकार ग्रामपंचायतींकडेच होते.आता मात्र, हे अधिकार प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आले असून वैद्यकीय अधिकाऱ्याला निबंधकाचा दर्जा देण्यात आला आहे.त्यानुसार आरोग्य केंद्रात होणाऱ्या जन्म-मृत्यू घटनेची नोंद करून प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे अधिकार वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
- Advertisement -

