Thursday, April 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता केवळ शिकवून चालणार नाही; तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे हे...

आता केवळ शिकवून चालणार नाही; तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे हे शिक्षकांचे आद्य कर्तव्य.. – कामगिरीची नोंद आता शिक्षकांच्या गोपनीय अहवालात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक बळ मिळावे,यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने प्राथमिक व उच्च प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते.यात इयत्ता चौथी व इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांचा समावेश असून यंदाच्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच २०२६ मधील परीक्षेसाठी शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरण्याबाबत अनेक जिल्ह्यांमध्ये उदासीनता दिसून आल्याने,आता शंभर टक्के नोंदणी न करणाऱ्या शाळांवर आणि संबंधित शिक्षकांवर थेट प्रशासकीय कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.विशेष म्हणजे,या परीक्षेतील कामगिरीची नोंद आता शिक्षकांच्या गोपनीय अहवालात (सीआर)केली जाणार आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे यांनी सर्व जिल्हा परिषदा,महानगरपालिका आणि शिक्षण संस्थांना कडक निर्देश दिले आहेत.शासनाच्या धोरणानुसार,शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यावर आता शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन केले जाईल.ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी शून्य किंवा कमी असेल, त्या शिक्षकांच्या सेवापुस्तिकेत (service book)किंवा गोपनीय अहवालात तसा नकारात्मक शेरा उमटवण्यात येणार आहे.यामुळे आता केवळ शिकवून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे हे शिक्षकांचे आद्य कर्तव्य ठरणार आहे.नियमित शुल्कासह आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत येत्या,शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आहे.ही अंतिम संधी असून, मुदतीनंतर कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही; असे स्पष्ट करण्यात आले आहे.यासंदर्भात नुकतीच शिक्षणमंत्री आणि शिक्षण आयुक्तांची बैठक पार पडली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करणे बंधनकारक असतांना अद्याप अनेक शाळांनी या प्रक्रियेकडे पाठ फिरविल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.त्यामुळे,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून २०२६ मध्ये होणाऱ्या प्राथमिक(इयत्ता चौथी)व उच्च प्राथमिक(इयत्ता सातवी)शिष्यवृत्ती परीक्षेबाबत अत्यंत कठोर पवित्रा घेण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!