Monday, April 27, 2026
Homeमुंबईआजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; स्टॅम्प पेपर महागला

आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; स्टॅम्प पेपर महागला

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ३० सप्टेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र मुद्रांक शुल्क सुधारणांना मंजुरी देण्यात आली होती.त्यानुसार राज्य सरकारने मुद्रांक शुल्कवाढीचा निर्णय घेतल्यामुळे आजपासून १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर बंद करून महसूल विभागाकडून आता केवळ ५०० रुपयांचे स्टॅम्प जारी केले जातील.त्यामुळे,आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री लागणार आहे.
सर्वसाधारणपणे जिथे १०० रुपये लागत होते तिथे आता ५०० रुपये द्यावे लागणार आहेत.महाराष्ट्र शासनाच्या मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाला चालू वर्षात सुमारे ६० हजार कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.गेल्या वर्षी या विभागाने राज्याच्या तिजोरीत ५० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली होती.मुद्रांक शुल्क हा राज्य सरकारच्या महसुलाचा मोठा स्त्रोत जरी असला,तरी लाडक्या बहिणींना दीड हजार दिले.परंतु त्याच बहिणीच्या खऱ्या भावाकडून काही हजार काढून घेतले जाणार आहे.आतापर्यंत नोटरीचा साधा स्टॅम्प १०० रुपयांना मिळत होता.आता तो ५०० रुपयांना मिळणार आहे.बहिणीला दिलेली रक्कम भावाकडून वसूल करून घेत असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमातून व्यक्त होत आहेत.
 
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रखरखत्या उन्हात लग्नसमारंभासाठी प्रवास; बसमध्येच सोडला प्राण.. – आज उष्णतेच्या लाटेचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या स्थितीत नागपूरसह विदर्भाचे तापमान वाढतच आहे.एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असून अंगाची लाहीलाही होत आहे.एप्रिल महिन्यातच ही स्थिती आहे,तर...

असे कोण करते सांगा? ग्रामसेविकेने शासकीय निधी सरकारी कामासाठी न वापरता चक्क व्याजाने दिले वाटून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासन स्तरावरून गावगाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा,यासाठी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर निधीचे वाटप करण्यात येते.मात्र,काही लोकसेवक मनमर्जिने कामे करून घरचीच...

भरधाव वेगातील रेतीने भरलेला ट्रॅक्टर उलटला अन् तरणेबांड पोरगा दगावला..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ट्रॅक्टरमध्ये रेती भरून रेतीची साठवणूक करण्यासाठी भरधाव वेगात निघालेला रेतीने भरलेला ट्रॅक्टर उलटला आणि चालत्या ट्रॅक्टरवरून खाली कोसळलेल्या चालकाच्या अंगावरून ट्रॅक्टरच्या...

पहिल्यांदा वाघिणीचा हल्ला; हल्ल्यात वनरक्षक गंभीर जखमी.. – अन् काही वेळातच ‘टी-८४’ वाघिणीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर शेतशिवार परिसरात आज,रविवार २६ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली.विशेष म्हणजे,शेतशिवारात भटकंती करणाऱ्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!