Monday, July 27, 2026
Homeमुंबईआजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; स्टॅम्प पेपर महागला

आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; स्टॅम्प पेपर महागला

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ३० सप्टेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र मुद्रांक शुल्क सुधारणांना मंजुरी देण्यात आली होती.त्यानुसार राज्य सरकारने मुद्रांक शुल्कवाढीचा निर्णय घेतल्यामुळे आजपासून १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर बंद करून महसूल विभागाकडून आता केवळ ५०० रुपयांचे स्टॅम्प जारी केले जातील.त्यामुळे,आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री लागणार आहे.
सर्वसाधारणपणे जिथे १०० रुपये लागत होते तिथे आता ५०० रुपये द्यावे लागणार आहेत.महाराष्ट्र शासनाच्या मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाला चालू वर्षात सुमारे ६० हजार कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.गेल्या वर्षी या विभागाने राज्याच्या तिजोरीत ५० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली होती.मुद्रांक शुल्क हा राज्य सरकारच्या महसुलाचा मोठा स्त्रोत जरी असला,तरी लाडक्या बहिणींना दीड हजार दिले.परंतु त्याच बहिणीच्या खऱ्या भावाकडून काही हजार काढून घेतले जाणार आहे.आतापर्यंत नोटरीचा साधा स्टॅम्प १०० रुपयांना मिळत होता.आता तो ५०० रुपयांना मिळणार आहे.बहिणीला दिलेली रक्कम भावाकडून वसूल करून घेत असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमातून व्यक्त होत आहेत.
 
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!