Tuesday, July 7, 2026
Homeपुणेअसेही एक गाव,विधवा महिलांच्या बांगड्या न फोडण्याचा ग्रामसभेतच घेतला ठराव...!- २६ जानेवारीला...

असेही एक गाव,विधवा महिलांच्या बांगड्या न फोडण्याचा ग्रामसभेतच घेतला ठराव…!- २६ जानेवारीला घेतला निर्णय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

पुणे :-आपल्या आजूबाजूला अशा काही चांगल्या घटना घडत असतात की ज्यामुळे समाजामध्ये एक सकारात्मकता येऊ लागते.असाच एक आदर्शवत निर्णय आंबेगाव तालुक्यातील आदर्शगाव गावडेवाडी गावाने घेतला आहे. या गावाने पतीच्या निधनानंतर बांगड्या न फोडण्याचा ठरावच ग्रामसभेत मंजूर केला. याला प्रोत्साहन देण्यासाठी या गावतील महिलांनी २५ विधवा महिलांची खणा-नारळने ओटी भरून आदर्श निर्माण केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल अशी घोषणाच या गावचे सरपंच स्वरुपा गावडे यांनी केली आहे.

समाजात विधवांबद्दलची बदलत चाललेली मानसिकता ही एका सकारात्मक विचारांची नांदी आहे. समाजातील विधवा प्रथा संपुष्टात आणण्यासाठी २५ विधवा महिलांची खणा-नारळाने ओटी भरण्यात आली. प्रजासत्ताक दिनी घेण्यात आलेल्या बांगड्या न फोडण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षानंतर कपाळावर हळद-कुंकू लाऊन मिळालेल्या सन्मानाने महिलांचा चेहेऱ्यावरचा आनंद द्विगुणीत करणारा होता. यापुढे संबंधित महिलांच्या हस्तेच अनेक शुभ कार्य करण्याचे देखील ठरवण्यात आले आहे. या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल अशी घोषणा सरपंच स्वरूपा ऋषिकेश गावडे यांनी केली. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सरपंच स्वरूपा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. या ग्रामसभेला ग्रामसेविका दिपाली थोरात, उपसरपंच योगिता गावडे, मुख्याध्यापिका शशिकला चिखले, सदस्या मंदा गावडे, प्रियांका गावडे, मंगल गावडे, स्नेहल गावडे, ज्योती गायकवाड, मीना सोपानराव निघोट उपस्थित होत्या. या ऐतिहासिक निर्णयाने विधवा महिला तर भारावून गेल्याच पण समाजामध्ये देखील एक सकारात्मक निर्णय झाल्याची भावना पहायला मिळाली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!