- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक विभागीय मंडळस्तरावर संवेदनशील परीक्षा केंद्रांची यादी निश्चित करण्यात आली आहे.गैरप्रकार होऊ नये, यासाठी लक्ष देण्यात येणार आहे.मागील वर्षीप्रमाणे यंदाही परीक्षा केंद्रांचे केंद्र संचालक व कर्मचारी यांची अदलाबदल करण्यात येणार आहे.त्यातच, गैरप्रकारमुक्त परीक्षेसाठी दहावी,बारावीच्या बोर्ड परीक्षा केंद्रांतील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत राज्य मंडळाने निर्देश दिले आहेत.त्यामुळे,विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे आवश्यक आहे.मागील शैक्षणिक वर्षात दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी अभ्यास न करता कॉपी करून पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला असता अनेकजण परीक्षेला मुकले होते.त्याचबरोबर, सदर परीक्षा केंद्रांना कारवाईला सामोरे जावे लागले होते.यंदाच्या शैक्षणिक वर्षात बारावीची परीक्षा ही १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे.तर,त्यापूर्वी तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केली आहे. तसेच दहावीची परीक्षा ही २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे.तर,तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.यंदा जिल्हास्तरीय दक्षता समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे.बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही.
- Advertisement -

