Tuesday, July 21, 2026
Homeब्रम्हपुरीअबब...! अन् रुग्णाच्या किडणीतून निघाला अर्धा किलोचा खडा- ब्रम्हपुरी तालुक्यातील तळोधी येथील...

अबब…! अन् रुग्णाच्या किडणीतून निघाला अर्धा किलोचा खडा- ब्रम्हपुरी तालुक्यातील तळोधी येथील रुग्णाला किडणी स्टोनचा होता त्रास

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रम्हपुरी :- दिवसेंदिवसहोणाऱ्या खानपाणातील बदलांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतांना दिसून येत आहेत.पूर्वी शंभर वर्षे आयुष्य जगणारे मानव आजच्या स्थितीत पन्नाशितच लुळकतात. महत्वाचे कारण म्हणजे आरोग्याची काळजी न घेणे वा त्याकडे दुर्लक्ष करून अनेक व्याधींना सामोरे जाऊन आजार बळावले जात असतात.अशाच प्रकारचे आजार ब्रम्हपुरी तालुक्यातील तळोधी येथील एका रुग्णाला किडणी स्टोनचा त्रास होता.किडनी स्टोनचा त्रास वाढत जाऊन लघवीतून रक्तस्राव होऊ लागला.अखेर सर्व तपासण्या केल्यानंतर ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर तब्बल तीन तासांची शस्त्रक्रिया करून सुमारे अर्धा किलोचा खडा मूत्राशयातून बाहेर काढण्यात आला.

प्रभाकर कारू राऊत वय ५५ वर्षे रा.तळोधी असे सदर रुग्णाचे नाव आहे.त्यांना किडणीस्टोनचा आधीपासूनच आजार होता.पण एक महिन्यापूर्वी त्यांना अचानक जास्तच पोटात दुखायला लागले.लघवीतून रक्तस्राव होत असल्यामुळे त्यांनी तळोधी येथील खाजगी डॉक्टरांचा सल्ला घेऊन सोनोग्राफी,एक्स रे काढून घेतले. शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्यानंतर त्यांनी लगेच आस्था हॉस्पिटल गाठले.तिथे डॉ.सुमित जयस्वाल व डॉ.जयंत निकोसे यांनी अगदी कुशलतेने तीन तासांची शस्त्रक्रिया पार पाडली.रुग्णाच्या मूत्राशयातून डॉक्टरांनी अर्धा किलोचा मुतखडा बाहेर काढला.दरम्यान,त्रास होत असतानाही आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने असा आजार उदभवतो,असे डॉ.सुमित जयस्वाल यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!