Wednesday, July 29, 2026
Homeगडचिरोलीअखेर रोजगार हमी योजनेच्या मजुरांची प्रतीक्षा संपली.. - मजुरीचे बाराशे कोटी रुपये...

अखेर रोजगार हमी योजनेच्या मजुरांची प्रतीक्षा संपली.. – मजुरीचे बाराशे कोटी रुपये राज्याला प्राप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांच्या हाताला काम देऊन मोठ्या प्रमाणावर अकुशल कामे करण्यात आली.कामे करून जवळपास सहा महिने लोटूनही जिल्ह्यातील मजुरांची कोट्यवधी रुपयांची मजुरी थकीत असल्याने मजुरांनी पोट कशाने भरावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे निर्दयी सरकारने मजुरांची मजुरी तात्काळ अदा करावी, अन्यथा जिल्हाभरात आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा ओबीसी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी दिला होता.अशातच आता रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी नुकतीच चर्चा झालेली असून त्यातील अकुशल कामाचे बाराशे कोटी रुपये राज्याला प्राप्त झालेले असल्याने सदरचा निधी हा प्रत्येक जिल्ह्याला वितरित करण्यात येणार आहे.त्यामुळे राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यातील थकीत मजुरी लवकरच मजुरांच्या खात्यात जमा होणार आहे.योजना राबवत असतांना कामाविषयी तक्रारी होत असतात,परंतु अधिकाऱ्यांनी तक्रारी होत आहेत म्हणून रोजगार हमीचे कामे उपलब्ध करून न देणे हे चुकीचे आहे. अधिकाऱ्यांनी याविषयी अधिक सजग भूमिका घेऊन प्रत्येक गावात मजूर व शेतकऱ्यांना रोजगार हमीचे कामे उपलब्ध करून दिली पाहिजेत,असेही मंत्री गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा कारागृहात कैद्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली यांच्या राष्ट्रीय विषाणूजन्य यकृतदाह नियंत्रण कार्यक्रम(NVHCP) अंतर्गत जिल्हा खुले कारागृह,गडचिरोली येथे आरोग्य जनजागृती, वैद्यकीय तपासणी...

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!