Tuesday, June 23, 2026
Homeगडचिरोलीअखेर फरार झालेल्या पतसंस्थेतील एजंटास पोलिसांनी केली अटक...- गडचिरोली येथील प्रकरण; ६७...

अखेर फरार झालेल्या पतसंस्थेतील एजंटास पोलिसांनी केली अटक…- गडचिरोली येथील प्रकरण; ६७ लाखांची रक्कम घेऊन झाला होता फरार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- विजया महिला नागरी सहकारी पतसंस्थेतील एजंट मंगेश नरड याने नवेगाव येथील १० नागरिकांकडून राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून दैनंदिन ठेवीसह फिक्स डिपॉझिट म्हणून जवळपास ६७ लाखांची रक्कम गोळा केली.रक्कम तर गोळा केली; मात्र काही गुंतवणकादारांना पैशाची गरज पडली असता पतसंस्थेत काही नागरिक गेले व रकमेविषयी चौकशी केली.एजंटाने गोळा केलेल्या रकमेची पतसंस्थेत नोंदच नसल्याचे उघड झाल्याने सदर प्रकरण चव्हाट्यावर आला होता.

नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे कळताच संबंधितांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात २० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती.त्यानुसार पोलिसांनी आपली चक्रे वेगाने फिरवीत अखेर एजंट मंगेश नरड यांस चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथून २४ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आल्याची माहिती गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद कतलाम यांनी दिली आहे.नरड याला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

मंगेश नरड हा विजया महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा दैनिक ठेवी गोळा करण्याबरोबरच तो पतसंस्थेचा व्यवस्थापक म्हणून काम सांभाळत होता.गेल्या अनेक वर्षापासून तो पतसंस्थेत काम करीत असल्याने खातेधारकांचा त्याने विश्वास संपादन केला होता.मात्र पैश्याच्या हव्यासापाई सर्वकाही गमावून बसला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!