- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मतदारसंघ असलेल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराच्या नामांतर प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली असून आता इस्लामपूर शहर ईश्वरपूर नावाने ओळखले जाणार आहे.इस्लामपूर शहराच्या नामांतराला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली होती.राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर आता केंद्र सरकारने देखील इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.राज्य सरकारकडून नावाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला होता.या प्रस्तावावर केंद्र सरकारने देखील मंजुरी दिली असल्यामुळे अखेर नामांतराचा मार्ग मोकळा झाला आहे.महायुती सरकारने यापूर्वी तीन जिल्ह्यांच्या नावात बदल केले आहेत.त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूर शहराचे नामांतर करण्याची मागणी केली होती.यापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहील्यानगर,औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर,तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले आहे.
- Advertisement -

