Friday, November 7, 2025
Homeचामोर्शी२ फेब्रुवारी पासून नळाला पाणीच नाही...- महावितरण नागरिकांच्या जीवावर उठले की काय?-...

२ फेब्रुवारी पासून नळाला पाणीच नाही…- महावितरण नागरिकांच्या जीवावर उठले की काय?- चामोर्शी तालुक्यातील घटना….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चामोर्शी :- तालुक्यातील कुनघाडा रै,तळोधी,मोकासा व नवेगाव रै येथील पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने खंडित केल्यामुळे २ फेब्रुवारी पासून तर आजतागायत पाणीपुरवठा बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा विचार न करता विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा नागरिकांच्या जीवावर उठली की काय? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जातो आहे.

गावातील बंद पाणी पुरवठ्यअभावी नागरिकांना पाण्यासाठी कोसो दूरवर पायपीट करावी लागत आहे. बंद पाणीपुरवठा योजना तत्काळ पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी कुनघाडा रै येथील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली असूनही अजूनपर्यंत पाणी पुरवठा सुरू करण्यात आला नाही; याचे नवल वाटत आहे.

पाणीपुरवठा नळ योजना बंद असल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची २ फेब्रुवारी २०२३ रोजी शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन नळ योजना सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा केली होती.तसेच ८ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी संजय मीणा व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी भुयार यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्यापही पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नसल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.अजून किती दिवस नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे; याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १ हजार ९७२ शाळांमध्ये निनादले ‘वंदे मातरम्’ चे सूर अन् देशभक्तीची लहर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.जिल्ह्यातील सर्व...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२...

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण...

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत 'वंदे मातरम' ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!