Wednesday, April 15, 2026
Homeचामोर्शीमहिनाभरात वाघाने दोन बोकड केले ठार…-चामोर्शी वनक्षेत्रात वाघाची प्रचंड दहशत…

महिनाभरात वाघाने दोन बोकड केले ठार…-चामोर्शी वनक्षेत्रात वाघाची प्रचंड दहशत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चामोर्शी(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी वनक्षेत्रात मागील काही महिन्यांपासून वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे.दिनांक -२ मे रोजी वाघाने वेलतूर तुकूम येथे बोकड ठार केल्याची घटना घडली होती.या घटनेनंतर एक महिन्याच्या कालावधीतच रविवारी,२ जून रोजी वाघाने याच परिसरातील नदी काठावरील शेतशिवारात हल्ला चढवित बोकड ठार केल्याची घटना घडली.महिनाभरात वाघाने दोन बोकड ठार केल्याने,या परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत आहेत.चामोर्शी वनक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या वेलतूर तुकूम येथील सोमनाथ परशूराम मंगल या शेतकऱ्यांच्या शेळ्या रविवारी वैनगंगा नदी काठालगतच्या शेतशिवारात चराईसाठी गेल्या होत्या. दरम्यान वाघाने यातील एका बोकडावर हल्ला चढवून  ठार केले.यात त्यांचे १८ हजाराचे नुकसान झाले. घटनेची माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्राधिकारी आर.बी.इनवते यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक गोवर्धन,वनरक्षक ए.एस. नैताम,पोलिस पाटील मुकुंदा सरकार,उपसरपंच दिंगाबर धानोरकर आदींनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला.दरम्यान वनरक्षक नैताम यांनी काल,सोमवारी,दिनांक -३ जून रोजी घटनास्थळालगत लावलेल्या ट्रॅप कमेऱ्याची पाहणी केली असता; ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद झाला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!