Wednesday, June 24, 2026
Homeमुंबईहेलिकॉप्टरने उड्डाण भरली अन् वादळ-वाऱ्याचा जोर.. - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आठ जण...

हेलिकॉप्टरने उड्डाण भरली अन् वादळ-वाऱ्याचा जोर.. – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आठ जण हेलिकॉप्टरमध्ये; इमर्जन्सी लँडिंग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला आज,गुरुवार ७ मे रोजी दुपारच्या सुमारास अचानकपणे बदलेल्या खराब हवामानाचा मोठा फटका बसला.मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्स येथून उड्डाण भरलेला हेलिकॉप्टर काही वेळातच वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडला.अश्यातच वैमानिकाने(पायलट)प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर लगेचच सुरक्षितपणे खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला.
एकनाथ शिंदे हे आज ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि मुरबाडच्या दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले होते. हेलिकॉप्टरमध्ये एकनाथ शिंदे,स्विय सहाय्यक प्रभाकर काळे,मुख्य जनसंपर्क अधिकारी विनायक पात्रूडकर, ओएसडी राजपूत,मुख्य सुरक्षा अधिकारी आणि इतर कर्मचारी तसेच पायलट असे एकूण आठ जण होते. हेलिकॉप्टर उड्डाणानंतर थोड्याच वेळात वादळात अडकले.सोसाट्याचा वादळी वारा आणि खराब दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते.अश्यातच संकटाचे स्वरुप लक्षात घेता पायलटने नियंत्रण कक्षाशी समन्वय साधून  हेलिकॉप्टर वादळाच्या तडाख्यातून बाहेर काढून सुरक्षितरित्या मुंबईतील जुहू विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले. यानंतर हेलिकॉप्टरमधील आठ जण सुरक्षितरित्या हेलिकॉप्टरमधून बाहेर पडले.सर्वजण सुरक्षित आणि सुखरुप असून पायलटने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!