Sunday, May 31, 2026
Homeकुरखेडाही कोणती पिक्चर..! जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत तरबेज अश्यांना कमी गुण;...

ही कोणती पिक्चर..! जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत तरबेज अश्यांना कमी गुण; तर रोजंदारी कर्मचाऱ्याला जास्त गुण.. – कुरखेडा तालुक्याच्या अरततोंडी गट ग्रामपंचायतीतील प्रकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या अरततोंडी गट ग्रामपंचायत तर्फे घेण्यात आलेल्या शिपाई पदाच्या परीक्षेत मोठा गोचा गोंधळ झाल्याचा आरोप परीक्षार्थी उमेदवारांनी केला आहे.विशेष म्हणजे,जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत तरबेज असूनही त्यांना परीक्षेत कमी गुण मिळाले; तर ग्रामपंचायतीत रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला जास्त गुण मिळाल्याने पेपरफुटी झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे, शिपाई पदाचा पेपर व परीक्षा पुनश्च घेण्याची मागणी ग्रामसेवक,सरपंच यांच्यामार्फत गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

शिपाई पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गट ग्रामपंचायत अरततोंडी येथील शिपाई या पदाकरीता परीक्षा घेण्यात आली होती. पण,शिपाई पदाच्या पेपरची परीक्षा होण्याअगोदरच पेपरफुटी झाली.जे विद्यार्थी दोन ते पाच वर्षे एमपीएससी,सरळसेवा,पोलीस भरतीची तयारी करतात, अश्या उमेदवारांना कमी गुण मिळाले व त्याच ग्रामपंचायत मधील कर्मचारीला १०० पैकी ९१ गुण मिळाले.हे कसे शक्य आहे? त्यामुळे सदर परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप करीत आपल्या कार्यक्षेत्रात नव्याने पेपर काढून परीक्षा घेत त्याच दिवशी निकाल जाहीर करावा,अशी मागणी ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे सुमेध मेश्राम,विपीन मेश्राम,प्रणय ठवरे,मुकेश सुखदेवे,अमोल शेंडे,अनमोल सुखदेवे,विशाल फटिंग, रंजना तुलावी,मयूर डोंगरवार,भुमेश तुलावी,मिथुन ठलाल,शुभम नाकाडे,आशिष पंधरे आदींसह अन्यायग्रस्त उमेदवारांनी केली आहे.

विशेष बाब म्हणजे,बऱ्याच ठिकाणी जवळच्याच व्यक्तीची नियुक्ती केली जाते.काही वर्षापूर्वी कुरखेडा तालुक्यात एका गाव पातळीवरील भरतीत ज्याची निवड करायची होती,अश्या उमेदवाराला संपूर्ण पेपरच्या प्रश्नांची उत्तरे सांगण्यात आली होती.यात पहिल्या प्रश्नाचे उत्तर ब,दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर ड असे सांगण्यात आले होते आणि त्या उमेदवाराने पूर्व तयारीनिशी एका ठिकाणी वाच्यता केली होती.त्यामुळे त्याचा भांडाफोड झाला होता.मात्र,सिस्टममधील काहीजण चोरांचे साथीदार असल्याने प्रकरणावर पूर्णविराम झाले होते.त्यामुळे सदरचा प्रकार तसा तर नाही नां? यासाठी पेपर कोणी तयार केला? कुणाशी काही देवाणघेवाण तर झाली नाही नां? याचा तपास करणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून उद्या,सोमवार १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यातील हवामानात अजून बदल होणार आहे.हवामान खात्याने,प्रामुख्याने...

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!