Tuesday, April 22, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तसोळावं वरीस धोक्याचे; अल्पवयीन मुलींची मानसिकता बदलणे गरजेचे..
spot_img

सोळावं वरीस धोक्याचे; अल्पवयीन मुलींची मानसिकता बदलणे गरजेचे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काळ बदलत चाललाय.पूर्वी मुलीचे वडील मुलीच्या लग्नासाठी मुलगा बघायला मुलाच्या घरी जायचे.मात्र,काळानुरूप बदल होऊन आता मुलाचे वडील वा कुटुंबीय लग्नासाठी मुलगी आहे काय? असेल तर आम्हाला याबाबत कळवाल काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे अनेक तरुण ‘अधुरी कहाणी लग्नाची’ म्हणत वयोवृध्द होऊ लागले आहेत.अशातच नव तारुण्यात पदार्पण करणाऱ्या अल्पवयीन मुली प्रेमाच्या आणाभाका घेत घरून पळून जातांना दिसून येतात.त्यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत संपर्कात असल्याने काही मुली प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात अडकतात,तर अनेक मुली घरच्यांच्या दबावाला घाबरून घर सोडतात.अल्पवयीन मुलींशी पालकांनी
योग्य संवाद साधणे अत्यावश्यक असते.त्यांचे मित्र-मैत्रिणी,इतर सहकारी यांची माहिती पालकांना असणे आवश्यक आहे.एखादी गोष्ट खटकली तर त्यांना विश्वासात घेऊन विचारणे योग्य ठरते.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या वयात अनावश्यक दबाव टाकणे टाळले पाहिजे.प्रेमप्रकरण,पैशांची चिंता,घरात होणारे वाद,अभ्यास किंवा लग्नासाठी दबाव,नातेवाइकांशी झालेले भांडण,घरातील वातावरण,घरात होणारा छळ,आजारपणाचा त्रास,बाहेरील जगाचे आकर्षण व विसंवाद यांमुळे मानसिकता बदलून अनेकदा अल्पवयीन मुली,महिला-पुरुष घर सोडून स्वतःचे निर्णय घेत बेपत्ता होत असतात.सोळावं वरीस धोक्याचे जरी असले तरीही घरच्यांनी याकडे लक्ष घालून अल्पवयीन मुलींची मानसिकता बदलणे गरजेचे झाले आहे.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

समोरून येणाऱ्या दुचाकीला बोलेरो वाहनाची जबर धडक; चौघांचा दुर्दैवी मृत्यू…

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील पाथरी गावानजिक रामनगरजवळ सोमवारच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास समोरून येणाऱ्या दुचाकीला बोलेरो वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा...

अखेर रोजगार हमी योजनेच्या मजुरांची प्रतीक्षा संपली.. – मजुरीचे बाराशे कोटी रुपये राज्याला प्राप्त..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांच्या हाताला काम देऊन मोठ्या प्रमाणावर अकुशल कामे करण्यात आली.कामे करून जवळपास सहा महिने लोटूनही जिल्ह्यातील मजुरांची कोट्यवधी...

वाळू धोरण जाहीर; पण पर्यावरण मंजुरी आवश्यकच..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सर्वत्र वाळू चोरीचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत असतांनाच शासनाकडून वारंवार वाळू धोरणात बदल करण्यात येत आहे.अशातच नुकतेच राज्य शासनाने वाळूचे नवे धोरण...

दारूच्या आहारी गेलेल्या पोटच्या मुलाची बापाने केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस अल्पवयीन मुलांसह,युवक, वयोवृध्द दारूच्या आहारी जाऊन स्वतःची तसेच कुटुंबाची बर्बादी करू लागले आहेत.काहीजण दारू ढोसून आपल्याच घरच्यांना त्रास देऊ लागले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!