- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून जवानांनी नक्षलवाद्यांचे २१४ तळ आणि बंकर उद्ध्वस्त केले आहेत.त्याचबरोबर,जंगल परिसरातून ४५० आईडी(इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस) म्हणजेच स्फोटक सामग्री,जी मोठ्या हमल्याकरीता वापरण्यात येणार होती व ८१८ बीजीएल शेल आणि ८९९ बंडल कोडेक्ससह मोठ्या प्रमाणावर डेटोनेटर जप्त करण्यात आले आहेत.सदरची कारवाई ही बिजापूरच्या करेगुट्टा क्षेत्रातील घनदाट जंगल परिसरात करण्यात आली.गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलविरोधी विशेष मोहिमेत सुरक्षा दलांना बिजापूरच्या जंगल भागात नक्षलवाद्यांच्या हालचालींची गुप्त माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे जवानांनी शोधमोहीम सुरू केली. जवानांची चाहूल लागताच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अंदाधुंध गोळीबार सुरू केला.त्यास जवानांनी तात्काळ चोख प्रत्युत्तर दिले.यात पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.अद्याप मारल्या गेलेल्या पाच नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.परिसरात शोधमोहीम सुरू असून आणखी नक्षलवादी ठार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- Advertisement -

