Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीसततच्या नापिकीमुळे शेतकरी बांधवांनी शेती विकण्याकडे वाढविला कल...- लागत खर्च जास्त तर...

सततच्या नापिकीमुळे शेतकरी बांधवांनी शेती विकण्याकडे वाढविला कल…- लागत खर्च जास्त तर उत्पन्न कमी असल्याचे कारण….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-देसाईगंज तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी वर्गांनी शेतीच्या सततच्या नापिकीमुळे कंटाळून शेती विकण्याचा सपाटा लावला आहे.शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये काही राम नाही म्हणून कोट्यवधी व लाखो रुपयास शेत्या विकण्यास सुरुवात केली आहे.

शेतीमधून पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न होत नसल्याने लागत खर्च जास्त व उपन्न कमी यामुळे कंटाळुन खाजगी शेती विकत घेणाऱ्या व व्यवसाय करणाऱ्या खरेदीदारांना शेती विकण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी बांधवांचे नशिबी कधी जास्तीचा पाऊस तर कधी कमी पाऊस,कधी महापूर तर कधी नापिकी,कधी किडीचा प्रादुर्भाव तर कधी पिकांची नासाडी,कधी बँकांचे कर्जाचे डोंगर तर कधी पैस्यांची कमतरता अशी बरीच प्रश्ने शेतकरी बांधवाना नेहमी भेडसावत असतात. 

त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे कशी सोडवावी असाही प्रश्न शेतकरी बांधवांना सतत भेडसावत असतो.शासन स्तरावरून शेतकऱ्यांची प्रश्ने सोडवायला वेळच नाही.शेतकरी बांधवांचे समस्यांचे निराकरण करण्यास कुणाकडे वेळच उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल होऊन शेती विकण्याकडे वळलेला दिसतो.भविष्यात शेत्या दिसणार की नाही?असा विचार मनात घर करून सोडत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!