उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केले; म्हणुन आज आपण सर्व बाबासाहेबांच्या संविधानामुळे उभे आहोत.डॉ.बाबासाहेबांचे स्वप्न होते की संपूर्ण देश बौद्धमय करीन; परंतु त्यांचे अपुरेच असल्याने हि जबाबदारी आपल्यावर येवुन ठेपली आहे.अश्या प्रकारचे मार्गदशन कान्हेकर यांनी गडचिरोली तालुक्यातील पोटेगांव येथील कार्यक्रमा प्रसंगी केले.बहुउद्देशिय मंडळ पोटेगांवच्या वतीने दिक्षाभूमी पोटेगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यकम प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला व त्यांना ध्वजारोहन करण्याचा बहुमान मिळाला.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन भोजराज कान्हेकर तर प्रमुख अतिथी म्हणुन आदिवासी युवा नेते विनोद मडावी,भोयर,मेश्राम, वनक्षेत्रपाल चौधरी,डॉविजय रामटेके आदि लाभले होते.याप्रसंगी प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी सांगितले की , डॉ.बाबासाहेब आबेडकरांनी तमाम बाधवांना धम्माची दिक्षा देताना नागपूर मधे R S S आहे म्हणुन नाही तर नागपूर मधे नाग वंशज लोकांची वस्ती होती.आर्य आणि नाग लोकांमधे युद्ध व्हायचे हे सर्व शांतीच्या मार्गाने बुद्धाकडे वळले पाहीजे म्हणुन विजया दशमीच्या दिवशी बाबासाहेबांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली.तो दिवस १४ ऑक्टोबर होता. प्रंसगी डॉ.विजय रामटेके, विनोद मडावी,भोयर आदींनी भाषणे दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सामाजीक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुजमकर यांनी तर आभार दिवाकर फुलझेले यांनी मानले. कार्यक्रमास सिद्धार्थ,गोवर्धन,देवाजी,बांबोळे,लेनिन कुकडकर रामटेके,संगिता मुजमकर,कल्पना फुलझेले, प्रतिज्ञा मंजुमकर,इंदिरा कुकुडकर सहीत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.