Sunday, September 6, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय,काही नसते भावा; नुसता देखावा...!

संपादकीय,काही नसते भावा; नुसता देखावा…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संपादकीय

संपादक/सत्यवान रामटेके 

उद्रेक न्युज वृत्त :-आपण नेहमीच बघत असतो की, काहीजण जनतेच्या भरवशावर आपला बोलबाला करून याची मागणी त्याची मागणी,यावर कारवाई करा,त्यावर कारवाई करा; असे सर्वत्र आढळून व दिसून येत आहे.ज्यांच्या वर जनता विश्वास ठेऊन पाठीशी उभी असते व म्हणते ‘तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है’ अशांचाच साथ सोडून; त्यांचाच विश्वासघात करून आपलीच पोळी शेकण्याचा अनेकजण प्रयत्न हल्ली करतांना दिसून येतात.त्यामुळेच काही नसते भावा; हा केवळ नुसता तुमच्या-आमच्यासाठी देखावा आहे.असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

अनेक वेळा केवळ समोरा-समोर आगळेवेगळे व चित्र- विचित्र आम्हा-तुम्हांस दाखवून याने हा केला; त्याने तो केला.परंतु नेमका कुणी काय केला; हेच काही कळत नाही.नुसती टीका-टिप्पणी करून ‘चलती का नाम गाडी’ असे केले जाते.जनतेची दिशाभूल करून मोठा गाजावाजा केला जातो.अशातच जनतेच्या भरवशावर ‘सुमडी मध्ये कोंबडी’ खाणारे अनेकजण भेटतात. हल्ली तशी परिस्थितीही निर्माण झाली आहे.नुसता देखावा.म्हणजे जनतेला काही कळत नाही; असे अनेकांना वाटतेय.आगे बढणाऱ्यांपेक्षाही मागे असणारी जनता ही सर्वात हुशार असते.हे विसरून चालणार नाही.जनता-जनार्दनाच्या आवाक्याच्या बाहेर जेव्हा जाणार; तेव्हा हीच जनता आपल्यास धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!