उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात अजून काही धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत.श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब पुनावाला याने तिची हाडे मिक्सरमध्ये टाकून त्याचा चुरा केला होता.यानंतर त्याने त्या राखेची विल्हेवाट लावली होती असा दिल्ली पोलिसांचा दावा आहे.आफताबने मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर जंगलात फेकून दिले होते. यामध्ये तिचे मुंडके सर्वात शेवटी होते. त्याने तब्बल तीन महिन्यांनी हे मुंडके फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी पोलिसांनी ६६०० पानांचे चार्जशीट दाखल केले आहे. चार्जशीटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार,१८ मे २०२२ रोजी हत्येच्या रात्री आफताबने झोमॅटोवरुन (Zomato) चिकन रोल मागवले होते.कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर श्रद्धा आफताबसह दिल्लीत वास्तव्यास आली होती.पण दिल्लीत आल्यानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये वाद सुरु झाले होते.घरखर्च,आफताबची प्रेयसी अशा अनेक मुद्द्यांवरुन दोघांमध्ये खटके उडू लागले होते. चार्जशीटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, आफताबच्या दिल्लीपासून ते दुबईपर्यंत प्रेयसी होत्या. ८ मे रोजी दोघेही मुंबईला जाणार होते.पण अचानक आफताबने तिकीट रद्द केले होते. यावरुन दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झाले होते.भांडणादरम्यान आफताबने गळा दाबून श्रद्धाची हत्या केली. चार्जशीटमध्ये सांगितले आहे.त्यानुसारआफताबने प्रथम मृतदेह एका प्लास्टिक पिशवीत गुंडाळून फेकून देण्याचा विचार केला होता.त्याने त्यासाठी पिशवीही विकत आणली होती.पण आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने ही योजना रद्द केली.यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले.यासाठी त्याने एक करवत,एक हातोडा आणि तीन चाकू विकत घेतले.बोटे वेगळी करण्यासाठी त्याने ब्लो टॉर्चचा वापर केला. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले.जेव्हा कधी घरी प्रेयसी यायच्या तेव्हा आफताब फ्रीजमधून मृतदेहाचे तुकडे काढून ते किचनमध्ये ठेवत असे असं पोलिसांनी सांगितले आहे. आफताबने श्रद्धाचा फोन आपल्याकडेच ठेवला होता. १८ मे नंतर तोच श्रद्धाच्या अकाऊंटचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.यानंतर त्याने तिच्या मोबाइलची विल्हेवाट लावली होती.पोलिसांना मृतदेहाचे २० तुकडे सापडले आहेत.पण अद्याप मुंडके सापडलेले नाही.पॉलीग्राफ आणि नार्को-टेस्टमध्ये आफताबने आपला गुन्हा कबूल केला आहे. यावेळी त्याने आपल्याला पश्चाताप होत असल्याचे म्हटले असल्याचाही उल्लेख चार्जशीटमध्ये आहे. आफताबचा कबुली जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही.त्याने पोलिसांसमोर दिलेला पहिला कबुलीजबाबही न्यायालयात वापरता येत नाही.अटक केलेल्या व्यक्तीने दिलेला दाखला केवळ न्यायदंडाधिकार्यासमोर सादर केल्यावरच पुरावा म्हणून वापरता येतो.