Tuesday, July 7, 2026
Homeचंद्रपूरशेतात काम करतांना विजेमुळे सलग दोन दिवसांत दोघांचा मृत्यू..

शेतात काम करतांना विजेमुळे सलग दोन दिवसांत दोघांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाकडून विदर्भातील काही ठिकाणी मेघ गघर्जना तसेच विजांचे कडकडाटसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता.त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यात बुधवारपासून मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस सुरु आहे.पाऊस पडत असल्याने शेतीच्या कामांना गती आली आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग शेतावर जाऊन कामे करतांना दिसून येत आहेत.अश्यातच शेतात कामे करतांना वा परतीच्या वाटेवर असतांनाच अचानकपणे अंगावर वीज कोसळल्याने सलग दोन दिवसांत दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.बुधवारी तळोधी परिसरात वीज कोसळल्याने सावर्ला येथे एक जण ठार,तर एक जखमी झाल्याची घटना ताजी असतांनाच  परत काल गुरुवारी नागभीड तालुक्यातील किटाळी (बोरमाळा)येथील शेत शिवारात रोवणीसाठी धान पऱ्हेच्या पेंढ्या पसरवित असतांना अंगावर वीज कोसळल्याने शेतमजुराचा मृत्यू झाला.अविनाश चंद्रभान उईके वय २५ वर्षे, रा. मेंढा माल असे मृताचे नाव असून तो किटाळी येथे नातेवाईकाकडे राहत होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!