- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्यात शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस येताच अनेकांचे धाबे दणाणले आहेत.ज्यांना शिक्षण क्षेत्रातील कुठलाही अनुभव नाही,अश्यांनाही मुख्याध्यापक,शिक्षक बनवून त्यांचे वेतन काढल्या गेले.यात शासनास कोट्यवधी रुपयांना चुना लावल्या गेला.अश्यातच बोगस शालार्थ आयडी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला निलेश वाघमारे यास आज,गुरुवार १४ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास सायबर पोलिसांनी नागपूरच्या धरमपेठ येथून अटक केली आहे.निलेश वाघमारे हा २०१९ ते ९ एप्रिल २०२५ या कालावधीत वेतन पथक अधीक्षक (प्राथमिक)म्हणून कार्यरत होता.नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून बोगस ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास ५०० च्यावर शिक्षकांची नावे समोर आली असून शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस असल्याची माहिती असूनदेखील वाघमारेने वेतन काढले होते.या प्रकरणात नीलेश वाघमारेला निलंबित करण्यात आले होते.घोटाळा उघडकीस येताच निलेश वाघमारे तब्बल चार महिने फरार होता.तत्पूर्वी मंगळवार १२ ऑगस्ट रोजी त्याने अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.मात्र,न्यायलयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.अश्यातच खुद्द वेतन पथकाच्या बोगस आयडीचा आरोपी मालक पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक घोटाळेबाज चव्हाट्यावर येऊन उबडे पडणार आहेत.
- Advertisement -

