Friday, June 19, 2026
Homeगोंदियाविहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे ग्रामपंचायतीच्या सदस्यांना भोवणार…

विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे ग्रामपंचायतीच्या सदस्यांना भोवणार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-अंतिम मुदत संपूनही ग्रामपंचायतीच्या  सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने ६० सदस्य अपात्र होण्याच्या मार्गावर आहेत.गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात जानेवारी २०२१,ऑक्टोबर २०२२ व डिसेंबर २०२२ मध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या.या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना ठराविक मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र(कॉष्ट व्हॅलीडीटी)संबंधित कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे.मात्र, ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाला.अशातच निवडून आलेल्या बऱ्याचशा सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडे सादर केले नसल्याचे आढळून आले.निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने मुदतवाढ देण्याचा विचार करण्यात आला.

ज्या व्यक्तीने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दिनांकापूर्वी जात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे अर्ज केलेला असेल आणि ती व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंचांच्या राखीव जागेवर निवडून आलेली असेल, परंतु शासनाने काढलेल्या अध्यादेशाच्या प्रारंभाच्या दिनांकास ज्याचा अर्ज पडताळणी समितीसमोर प्रलंबित असेल, अशी व्यक्ती अध्यादेशाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर करतील, असे स्पष्टपणे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या १० जुलै २०२३ च्या अध्यादेशात नमूद आहे.

ग्रामपंचायतीच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची संधी १० जुलै २०२४ पर्यंत होती; असे अध्यादेशात नमूद केल्याप्रमाणे तालुका निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे.

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांनी १० जुलैपर्यंत वैधता प्रमाणपत्र सादर केलेच नसल्याची माहिती आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यात जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीतील निवडून आलेले २१ सदस्य,ऑक्टोबर २०२२ च्या निवडणुकीतील सात सदस्य,डिसेंबर २०२२ च्या निवडणुकीतील ३२ सदस्य, अशा एकूण ६० सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याची खात्रीदायक माहिती मिळाली असल्याने ६० सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!