- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मुधोली रिठ येथील ४० वर्षीय विद्यमान सरपंचाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल,सोमवार ५ मे रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मंगलदास आत्राम रा.मुधोली रिठ,ता.चामोर्शी, जि.गडचिरोली असे मृत सरपंचाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की,घटनेच्या दिवशी मंगलदास आत्राम हे घरीच होते.अशातच सकाळच्या सुमारास ते घराबाहेर पडले.बराच कालावधी होऊनही घरी परतलेच नाही.त्यातच दुपारच्या सुमारास ३ वाजेच्या दरम्यान मुधोली चक.नं.२ गावातील काही शेतकरी शेत बांधावर गेले असता,त्यांना शेतशिवारातील एका वृक्षाला मंगलदास आत्राम हे लटकलेल्या अवस्थेत दिसून आले.सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच नागरिकांनी एकच गर्दी केली.विद्यमान सरपंचाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कां उचलले? अश्या चर्चांना उधाण आले.काही नागरिकांनी घटनेची माहिती आष्टी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह खाली उतरवित पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला.घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

