Wednesday, June 10, 2026
Homeमुंबईवाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.केंद्र व राज्य सरकारकडून पुरवठा न मिळाल्यास मे महिन्यानंतर एसटीच्या भाड्यात वाढ करावी लागू शकते,असे त्यांनी स्पष्ट केले.आज,सोमवार १८ मे रोजी मंत्रालयात महामंडळाची बैठक पार पडली.बैठकीत बोलतांना सरनाईक म्हणाले की,एसटी महामंडळाला दररोज सुमारे १० लाख ८७ हजार लिटर डिझेलची आवश्यकता असते.इंडियन ऑईल कंपनीकडून डिझेलचा पुरवठा होत असला तरी मागील आठवड्यात डिझेलच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ झाली आहे.या वाढीमुळे महामंडळाला दररोज तब्बल ३३ लाख ७० हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असून,वार्षिक तोटा १२४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी म्हटले.जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संकेत दिल्याचे सरनाईक म्हणाले.भविष्यात परिस्थिती कशी राहील हे सांगणे कठीण आहे.मात्र,केंद्र किंवा राज्य सरकारकडून विशेष सवलत मिळाल्यास एसटी भाडेवाढ टाळण्याचा प्रयत्न केला जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.उद्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भातील पत्र देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.मे महिन्यापर्यंत कोणतीही भाडेवाढ केली जाणार नाही.पुढील १० ते १२ दिवसांत सरकारकडून मदत मिळाल्यास दरवाढ टाळली जाईल,अन्यथा एसटीचे तिकीट दर वाढवावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.तिकीट दर वाढले तर याची झळ पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!