उद्रेक न्युज वृत्त :-‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या ग्रामीण आणि दुर्गम भागातील आहेत.अनेकदा तांत्रिक माहितीचा अभाव, नेटवर्कच्या समस्या किंवा घाईगडबडीमुळे ई-केवायसी करतांना महिलांकडून चुका झाल्याचे सरकारच्या निदर्शनास आले.अशा चुकांमुळे अनेक पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर,ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळावी,अशी मागणी करणारी अनेक निवेदने महिला व बालविकास विभागाला प्राप्त झाली होती.या मागण्यांची गंभीर दखल घेत आणि महिलांच्या सोयीसाठी सरकारने संवेदनशील निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाखो लाभार्थी महिलांना मोठा दिलासा देत अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करतांना अनावधानाने झालेल्या चुका सुधारण्यासाठी आता राज्य सरकारने अंतिम संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार,लाभार्थी महिलांना आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसीमधील त्रुटी दुरुस्त करता येणार असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.३१ डिसेंबरपर्यंत पोर्टलवर जाऊन महिलांना त्यांच्या ई-केवायसी अर्जात ‘एकदाच’ सुधारणा करता येईल,सदरची शेवटची संधी असल्याने महिलांनी काळजीपूर्वक माहिती भरावी,असेही आवाहन करण्यात आले आहे.केवळ केवायसी नोंदणीसाठी मुदतवाढच नाही,तर विभागाने आणखी एक महत्त्वपूर्ण तांत्रिक बदल केला आहे.ज्या लाभार्थी महिलांचे पती हयात नाहीत किंवा ज्यांचे वडील हयात नाहीत,अशा महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करतांना अनेक अडचणी येत होत्या.या समस्येचे निराकरण करण्यासाठी आता पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यामुळे या घटकातील महिलांनाही आता आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

