Monday, July 13, 2026
Homeनागपूरआमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक बदनामी करतांना दिसून येतात. सर्वसामान्य नागरिकांकडे कुठलाही पॉवर नसल्याने जाऊ द्या ना..!आपल्याला काय करायचे? असे म्हणून विषय वाढवण्याचे टाळत असतात.मात्र,एखाद्या लोकप्रतिनिधीची नाहक बनामी करून बातम्या प्रसारित करणे चार ‘यूट्यूब’ चॅनल पत्रकारांना चांगलेच महागात पडले आहे.प्रकरणी काल शनिवारी चार पत्रकार व एक संपादक यांचेवर विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून विशेषाधिकार समितीने चार पत्रकारांना पाच दिवसांच्या कारावासात पाठविण्याची शिफारस केली आहे.
अकोल्यातील ‘सत्य लढा'(Satya Ladha News) या यूट्यूब चॅनलने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधान परिषद सदस्य(आमदार)अमोल मिटकरी यांच्या बाबतीत बदनामीकारक तसेच तथ्यहीन वृत्त प्रसारित केले होते. यामुळे मिटकरी यांची प्रतिमा मलिन झाली होती. संबंधित यूट्यूब चॅनलचे पत्रकार गणेश सोनावणे,हर्षदा सोनावणे,अमोल नांदुरकर,अंकुश गावडे व संपादक सतीश देशमुख यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाची हक्कभंग विशेषाधिकार समितीद्वारे चौकशी झाली.समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, ‘सत्य लढा’ यूट्यूब चॅनलवरून अमोल मिटकरी यांच्याबाबत खोटे व दिशाभूल करणारे आरोप करण्यात आले.यामुळे एका लोकप्रतिनिधीची राजकीय प्रतिष्ठा मलिन झाली असून हा विशेषाधिकारांचा भंग ठरतो.या प्रकरणात संपादकाने लेखी माफी मागितल्याने त्याच्यावर कारवाई न करण्याची शिफारस समितीने केली आहे.तर उर्वरित चारही जणांना पाच दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.जेव्हा विधिमंडळाचे सत्र सुरू असेल त्या कालावधीत त्यांना कारावासात पाठविण्यात यावे,अशी शिफारस समितीने केली आहे. जर या सत्रात कारावास झाला नाही तर पुढील विधिमंडळ सत्रात याची पूर्तता करण्यात यावी असेही समितीने अहवालात स्पष्ट केले.यामुळे सोशल मीडिया असो वा डिजिटल माध्यम असो एखाद्या बाबीचे तथ्य तसेच सत्यता पडताळूनच पुढील पाऊल उचलणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!