Friday, April 10, 2026
Homeगडचिरोलीलग्नासाठी मुली मिळेना...! वंशाचा दिवाच हवा; कधी  मानसिकता बदलणार?

लग्नासाठी मुली मिळेना…! वंशाचा दिवाच हवा; कधी  मानसिकता बदलणार?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- ‘ मुला पेक्षा मुलगी बरी प्रकाश देतोय दोन्ही घरी’..! असे म्हटले जात असेल तरीही आजच्या घडीला मुलगा हा वंशाचा दिवा आहे असा गैरसमज समाजात आजही आहे.मुलीला दुय्यम स्थान देण्याची गोष्ट केली जाते.मुलगा-मुलगी दोघे समान ही धारणा समाजात रुजू होणे आवश्यक आहे.ही मानसिकता ठेवणाऱ्यांवर कायद्याचा वचक असतोच.मात्र मुलींची संख्या कमी असल्याने मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे दिसते.तसेच ज्या मुली आहेत त्यांच्या अपेक्षाही मोठ्या आहेत.शासकीय नोकरदार, उद्योजक अशीच मागणी असल्याने सामान्य आणि बेरोजगार असलेल्या मुलांना लग्नासाठी मुली मिळेना झाले आहे.मुलांची दिवसेंदिवस वय वाढतच चालली आहे. अशातच मुलींच्या अपेक्षेत वाढ झाली आहे.

सुशिक्षित बेरोजगारांची संख्या शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही वाढत चालली आहे.ग्रामीण भागातील मुलीही आता शासकीय नोकरी वाल्यांना पसंती देत आहेत.काही भागात तर सुशिक्षित मुले वय होवूनही अविवाहीत आहेत.शासकीय नोकरी नसल्याने अनेकांचा पत्ताच कट केला जातो आहे.शेती असून शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे.

मुलीचीच नव्हे तर वधूपित्याची पहिली पसंती शासकीय नोकरीतील मुलांनाच अधिक आहे.त्या खालोखाल खाजगी नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या मुलांना अधिक पसंती दिली जाते.मात्र शेतकरी आणि ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना मात्र मुलगी मिळणे आधुनिक युगात कठीण झाले आहे.काही तरूण बिना हुंड्याने विवाह करायला तयार आहेत.परंतू वधूपिता मुलगी द्यायला तयार नाही.पूर्वीच्या काळात हुंडा व मुलगी अनेकांना मिळत होती.परंतू आधुनिक काळात त्यात बदल झाला आहे. त्यामुळेच वधूपिता आपली मुलगी सुखाने राहावी, यासाठी शासकीय नोकरीवर असलेला जावई शोधत आहेत.गावागावातच आता वरासाठी वधू शोधन्याचे काम सुरू आहे.परंतू जो-तो वधूपिता शासकीय नोकरी असणाऱ्यांनाच प्राधान्य देत आहे. शेतकऱ्याच्या मुलाचा भाव लग्नाच्या बाजारात घसरलेला आहे.चार ते दहा एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळणे कठीण जात आहे.एव्हढेच नव्हे तर मामा सुद्धा शेतकरी असलेल्या भाच्याला मुलगी देणे नापसंत करीत आहेत.त्यामुळे लग्नाळू मुलांना मुली मिळणे कठीण जात आहे.त्यामुळे वंशाचा दिवाच हवा ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.अन्यथा लग्नासाठी ‘कुणी मुली देता कां? मुली’….असे झाल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाइलवर बोलण्याच्या नादात बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने कारने उडवले पती-पत्नीला..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाइलवर बोलण्याच्या नादात एका खासगी बँकेत शाखा व्यवस्थापक असलेल्या कार चालकाने दुचाकीने घरी परतणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती...

वेळ,पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च वाचवायचा असेल तर लोकअदालतीचा घ्या लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रलंबित प्रकरणांच्या जलद व सामोपचाराने निपटाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली यांच्या वतीने येत्या,...

आईच्या निधनानंतर वडिलाने लग्न करू नये म्हणून १९ वर्षीय मुलाने वडिलाची केली निर्घृण हत्या..

उद्रेक न्युज वृत्त :-नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो,याचे भीषण उदाहरण मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याच्या रुई गावात आज,गुरुवार ९ एप्रिल रोजी...

खोटी बातमी प्रसारित केल्याप्रकरणी दोन यू-ट्यूब चॅनल्सविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शहराच्या गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या दोसरभवनचौक परिसरात डॉ.उज्वल लांजेवार यांच्या इमारतीच्या खुल्या जागेमध्ये मंगळवार,७ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास संशयास्पद स्फोटके...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!