Monday, March 17, 2025
Homeनागपूररेल्वेत बसतांना अपघात घडल्यास नुकसानभरपाई- प्रवाशाने स्वतःहून अपघात घडवला आधी सिद्ध करा..-...
spot_img

रेल्वेत बसतांना अपघात घडल्यास नुकसानभरपाई- प्रवाशाने स्वतःहून अपघात घडवला आधी सिद्ध करा..- मुबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंपीठाने दिला निर्णय….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर:- एका महिला प्रवाशाचा चालत्या रेल्वेत बसतांना खाली पडून मृत्यू झाल्यामुळे मध्य रेल्वेने पीडित वारसदारांना भरपाई देण्यास नकार दिला होता.रेल्वे कायद्यानुसार ही दुर्दैवी घटना नाही.प्रवाशाने स्वतःहून अपघात करून घेतला.त्यामुळे रेल्वे भरपाई देण्यास जबाबदार नाही;असा दावा न्यायालयात करण्यात आला होता.न्यायालयाने हे मुद्दे बेकायदेशीर ठरविले.प्रवाशाने स्वतःहून अपघात करून घेतला हे मान्य करण्यासाठी प्रवाशाचा तसा उद्देश होता; हे आधी सिद्ध करणे आवश्यक आहे.प्रकरणातील प्रवाशाने आत्महत्या केली.असे रेल्वेचे म्हणणे नाही. 

 त्यामुळे अशा प्रकरणांत रेल्वेची काहिही चूक नसली तरी मृताच्या वारसदारांना भरपाई देणे बंधनकारक के आहे,असे न्यायालयाने सांगितले.  दीपलक्ष्मी बांधे (50) असे मृत प्रवाशाचे नाव होते.त्या नागपूर येथील रहिवाशी होत्या. न्यायालयाने त्यांच्या वारसदारांना ८ लाख रुपये भरपाई मंजुर केली आहे.

रेल्वे तिकिटाचा मुद्दाही खारीज 

प्रवासी महिलेकडे रेल्वेचे तिकीट नव्हते.त्यामुळे तिचे वारसदार भरपाईसाठी अपात्र आहेत, असा मुद्दा देखील रेल्वेने उपस्थित केला होता.न्यायालयाने तो मुद्दाही खारीज केला.केवळ रेल्वे तिकीट मिळाले नाही म्हणून प्रवासी तिकिटाशिवाय रेल्वे प्रवास करीत होती, असे म्हणता येणार नाही.अपघातानंतर तिकीट हरवले जाऊ शकते,याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

17 वर्षांपूर्वी वर्धा रेल्वे स्थानकावर घडली घटना

ही घटना 17 वर्षांपूर्वी वर्धा रेल्वे स्थानक येथे घडली. प्रवासी महिलेला 12 फेब्रुवारी 2006 रोजी अमरावती-नागपूर पॅसेंजरने वर्धा येथून नागपूरला यायचे होते. त्या फलाटावर पोहोचण्यापूर्वीच रेल्वे चालायला लागली. त्यामुळे त्या पुलावरून धावत येऊन रेल्वेत बसताना खाली कोसळल्या व रेल्वेखाली आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

कायद्यात दुर्दैवी घटनेची व्याख्या

रेल्वे कायद्यातील कलम १२३ (सी) मध्ये दुर्दैवी घटनेची व्याख्या देण्यात आली आहे.त्यानुसार, प्रवासी रेल्वेत, रेल्वे प्रतीक्षा कक्षात, आरक्षण व बुकिंग कार्यालयात.फलाटावर किंवा इतर रेल्वे परिसरात दहशतवादी घातपात घडणे. हिसक हल्ला घडणे, दरोडा पडणे, दंगल, गोळीबार, जाळपोळ होणे किंवा रेल्वेतून प्रवासी खाली पडणे या घटना दुर्दैवी घटना आहेत.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बंद ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून अज्ञाताने ग्रामपंचायतीची कागदपत्रे जाळली..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव ग्रामपंचायत येथील सुट्टीच्या दिवसांची संधी साधून अज्ञाताने बंद ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून कार्यालयातील लोखंडी आलमारीतील महत्वाची कागदपत्रे पेट्रोल ओतून...

२२ वर्षीय तरुणीची राहत्या घरीच गळफास

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिचोली येथे एका २२ वर्षीय तरुणीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रविवार सकाळच्या सुमारास उघडकीस...

दुचाकी स्लीप होऊन बसचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-पती-पत्नी आणि मुले घेऊन आपले स्वगावी दुचाकीने जात असतांना वाटेतच दुचाकी स्लीप होऊन समोरून येणाऱ्या बसचे चाक खाली कोसळलेल्या पत्नीच्या डोक्यावरून...

वाघाचे अवयव शिकार प्रकरणी धक्कादायक माहिती; सट्टापट्टीत आकडे सांगण्यासाठी वाघाच्या अवयवांचा वापर..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर प्रादेशिक वनविभागांतर्गत येणाऱ्या खापा वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून अज्ञात शिकाऱ्यांनी वाघाचे चारही पंजे,मिशा आणि दात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!