Monday, December 8, 2025
Homeनागपूररेल्वेत बसतांना अपघात घडल्यास नुकसानभरपाई- प्रवाशाने स्वतःहून अपघात घडवला आधी सिद्ध करा..-...

रेल्वेत बसतांना अपघात घडल्यास नुकसानभरपाई- प्रवाशाने स्वतःहून अपघात घडवला आधी सिद्ध करा..- मुबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंपीठाने दिला निर्णय….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर:- एका महिला प्रवाशाचा चालत्या रेल्वेत बसतांना खाली पडून मृत्यू झाल्यामुळे मध्य रेल्वेने पीडित वारसदारांना भरपाई देण्यास नकार दिला होता.रेल्वे कायद्यानुसार ही दुर्दैवी घटना नाही.प्रवाशाने स्वतःहून अपघात करून घेतला.त्यामुळे रेल्वे भरपाई देण्यास जबाबदार नाही;असा दावा न्यायालयात करण्यात आला होता.न्यायालयाने हे मुद्दे बेकायदेशीर ठरविले.प्रवाशाने स्वतःहून अपघात करून घेतला हे मान्य करण्यासाठी प्रवाशाचा तसा उद्देश होता; हे आधी सिद्ध करणे आवश्यक आहे.प्रकरणातील प्रवाशाने आत्महत्या केली.असे रेल्वेचे म्हणणे नाही. 

 त्यामुळे अशा प्रकरणांत रेल्वेची काहिही चूक नसली तरी मृताच्या वारसदारांना भरपाई देणे बंधनकारक के आहे,असे न्यायालयाने सांगितले.  दीपलक्ष्मी बांधे (50) असे मृत प्रवाशाचे नाव होते.त्या नागपूर येथील रहिवाशी होत्या. न्यायालयाने त्यांच्या वारसदारांना ८ लाख रुपये भरपाई मंजुर केली आहे.

रेल्वे तिकिटाचा मुद्दाही खारीज 

प्रवासी महिलेकडे रेल्वेचे तिकीट नव्हते.त्यामुळे तिचे वारसदार भरपाईसाठी अपात्र आहेत, असा मुद्दा देखील रेल्वेने उपस्थित केला होता.न्यायालयाने तो मुद्दाही खारीज केला.केवळ रेल्वे तिकीट मिळाले नाही म्हणून प्रवासी तिकिटाशिवाय रेल्वे प्रवास करीत होती, असे म्हणता येणार नाही.अपघातानंतर तिकीट हरवले जाऊ शकते,याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

17 वर्षांपूर्वी वर्धा रेल्वे स्थानकावर घडली घटना

ही घटना 17 वर्षांपूर्वी वर्धा रेल्वे स्थानक येथे घडली. प्रवासी महिलेला 12 फेब्रुवारी 2006 रोजी अमरावती-नागपूर पॅसेंजरने वर्धा येथून नागपूरला यायचे होते. त्या फलाटावर पोहोचण्यापूर्वीच रेल्वे चालायला लागली. त्यामुळे त्या पुलावरून धावत येऊन रेल्वेत बसताना खाली कोसळल्या व रेल्वेखाली आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

कायद्यात दुर्दैवी घटनेची व्याख्या

रेल्वे कायद्यातील कलम १२३ (सी) मध्ये दुर्दैवी घटनेची व्याख्या देण्यात आली आहे.त्यानुसार, प्रवासी रेल्वेत, रेल्वे प्रतीक्षा कक्षात, आरक्षण व बुकिंग कार्यालयात.फलाटावर किंवा इतर रेल्वे परिसरात दहशतवादी घातपात घडणे. हिसक हल्ला घडणे, दरोडा पडणे, दंगल, गोळीबार, जाळपोळ होणे किंवा रेल्वेतून प्रवासी खाली पडणे या घटना दुर्दैवी घटना आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोलीत साहित्यिकांची मांदियाळी..! नाट्यश्रीचा वाङ्ममय पुरस्कार सोहळा व काव्य संमेलन संपन्न.. – इंग्लंड,गोवा,बुऱ्हाणपूर,बंगलोर येथील साहित्यिकांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंचच्या वतीने आयोजित महामृत्युंजय वाङ्ममय पुरस्कार सोहळा तसेच कवी संमेलनासाठी राज्यभरातून तसेच देश विदेशातून साहित्यिकांची मांदीयाळी काल,रविवार ७...

एका ठिकाणी पती-पत्नीने; तर दुसऱ्या ठिकाणी टॉप टेन नक्षलवाद्यांनी सोडली लाल दहशत..

उद्रेक न्युज वृत्त :-दुर्गम भागात बऱ्याच कालावधीपासून लाल दहशतीचे सावट पसरले होते.यामुळे तेथील विकास कोसोदुर राहिला आणि अजूनही काही ठिकाणी जैसे-थे अवस्था पहावयास मिळत...

अजब रोमियोचा गजब कारनामा..! नर्सिंग कॉलेजात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला रस्त्यात गाठले अन् गालाचा घेतला मुका.. – आरोपीची तुरुंगात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपुर :-जिल्ह्याच्या भिवापूर शहरात अजब रोड रोमियोचा गजब कारनामा उघडकीस येताच पोलिसांनी अटक केल्यानंतर लागलीच त्याला भिवापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयापुढे...

दौलत कुथे ‘नाट्यश्री २०२५’ पुरस्काराने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली यांच्या वतीने आयोजित ‘महामृत्युंजय वाड्:मय स्पर्धा २०२५’ पुरस्कार वितरण सोहळा काल,रविवार ७ डिसेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!