- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ग्रामस्थांनी मनात आणले तर सर्वकाही करू शकतात.अडीच वर्षापूर्वी जनतेने भरघोस मतांनी थेट सरपंचपदी निवडून दिले. मात्र,त्याच जनतेने घरी बसवले आहे.’गाव करी ते राव न करी’ याचा प्रत्यय परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील कुपटा ग्रामपंचायतीत उघडकीस आला आहे.थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला जनतेनंच एका झटक्यात घरी बसवले आहे.राज्याच्या राजकारणात पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.कुपटा ग्रामपंचायतीच्या सरपंचा रुख्मिणीबाई गवळे असे पदावरून पायउतार झालेल्या महिलेचे नाव आहे.
ग्रामपंचायत म्हटले तर सर्वांशी मिळून,एकजूट होऊन कार्य पार पाडावे लागतात.थेट सरपंच हा जनतेमधून निवडून दिलेला असला,तरीही मनमानी कारभार करून चालणार नाही.अशातच विकासात्मक कामे न करता तसेच जनतेची कामे होत नसल्याने नाराज झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच रुख्मिणीबाई गवळे यांच्या विरोधात ९ सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला होता.त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी अमितकुमार मुंडे होते.तर सचिवपदी पी.एस. हरीविठ्ठल यांची नियुक्ती करण्यात आली होती.विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायतीचे कर्मचारी,शिक्षक व पोलीस प्रशासन यांची उपस्थिती होती.बोलावण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला.विशेष ग्रामसभेत झालेल्या मतदानात ४०३ उपस्थितांपैकी ३५१ मतदारांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात वर करून मतदान केले.तर १७ नागरिकांनी ठरावाविरोधात मते दिली.तर ३५ जणांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.मतदान प्रक्रिया शिरगणती व हातवर करून पार पडली.अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाल्यामुळे ग्रामपंचायत अधिनियमानुसार आता पुढील कार्यकाळासाठी उपसरपंच ग्राम पंचायतीचा कार्यभार सांभाळणार आहेत.महिला आरक्षण असल्याने रुख्मिणीबाई गवळे सरपंच झाल्या होत्या.२५ महिने त्या पदावर ही राहील्यात पण गावातील नऊ पैकी नऊ सदस्य विरोधात गेले.त्यामुळे मतदार ही ग्राम पंचायत सदस्यांच्या बाजूने वळले आणि गवळे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.
- Advertisement -

