Monday, December 8, 2025
Homeमुंबईरतन टाटा,धीरूभाई अंबानी कोट्यवधीचे साम्राज्य उभारणारे शून्यातून आले वर

रतन टाटा,धीरूभाई अंबानी कोट्यवधीचे साम्राज्य उभारणारे शून्यातून आले वर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 मुंबई : जगभरातील अब्जाधिश आज अब्जावधी संपत्तीचे मालक आहेत.पण एक काळ असा होता;ज्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यात मोठा संघर्ष केला.अनेकांनी नोकरी करत आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

रतन टाटांची पहिली नोकरी
देशातील उद्योगपती रतन टाटा यांनी १९६१ मध्ये टाटा स्टील जमशेदपूरमध्ये नोकरी केली होती.त्याआधी रतन टाटांनी टाटा मोटर्समध्ये नोकरी केली होती. या कंपनीत ते एक कर्मचारी म्हणून काम करत होते. ज्यावेळी टाटांनी पहिल्या नोकरीची ऑफर आली, त्यावेळी त्यांच्याकडे नोकरीसाठी बायोडाटाही तयार नव्हता.

धिरूभाई अंबानी

धिरूभाई अंबानींनी कोट्यवधींचं साम्राज्य उभारले. पण एकेकाळी ते अतिशय साधी नोकरी करीत होते.ते यमनमध्ये एका गॅस स्टेशनवर एक अटेंडेंट म्हणून नोकरी करत होते.ही त्यांची पहिली नोकरी होती.त्यावेळी त्यांना केवळ ३०० रुपये मिळत होते.काही काळात मेहनतीच्या जोरावर ते गॅस स्टेशनवर मॅनेजर झाले.त्यानंतर १९५७ मध्ये ते भारतात परतले.त्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला.हाच व्यवसाय नंतर रिलायन्स इंडस्ट्री बनला आणि २००६ मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमझ्ये धिरूभाई १३८व्या क्रमांकावर होते.

नारायणमूर्ती
भारतात IT सेक्टरचे जनक म्हणून ओळखले जाणारे इन्फोसिसचे फाउंडर नारायणमूर्ती यांची पहिली नोकरी रिसर्च असोसिएट होती.नारायणमूर्ती IIM अहमदाबादच्या एका फॅकल्टीसाठी काम करत होते.तिथेच ते चीफ सिस्टम मॅनेजर बनले.त्यानंतर त्यांनी एक सॉफ्ट्रॉनिक्स नावाची कंपनी सुरू केली.जी चालली नाही.त्यानंतर त्यांनी पुण्यात पाटणी कंप्यूटर सिस्टम्समध्ये नोकरी सुरू केली. त्यांना १० हजार रुपये वेतन मिळत होते.त्यानंतर १९८१ मध्ये त्यांनी ६ मित्रांसह इन्फोसिसची सुरुवात केली.ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ४.३ बिलियन डॉलर इतकी झाली.कंपनी सुरू करण्याचा विचार केला त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते.त्यावेळी पत्नीकडून त्यांनी काही पैसे घेऊन कंपनी सुरू केली.नारायणमूर्तींच्या घरातील एक खोली त्यांच्या कंपनीचे ऑफिस होते.

अशा प्रकारे परिस्थितीवर मात करून आज कोट्यधीश यांच्या यादीत सर्वांचे स्थान आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोलीत साहित्यिकांची मांदियाळी..! नाट्यश्रीचा वाङ्ममय पुरस्कार सोहळा व काव्य संमेलन संपन्न.. – इंग्लंड,गोवा,बुऱ्हाणपूर,बंगलोर येथील साहित्यिकांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंचच्या वतीने आयोजित महामृत्युंजय वाङ्ममय पुरस्कार सोहळा तसेच कवी संमेलनासाठी राज्यभरातून तसेच देश विदेशातून साहित्यिकांची मांदीयाळी काल,रविवार ७...

एका ठिकाणी पती-पत्नीने; तर दुसऱ्या ठिकाणी टॉप टेन नक्षलवाद्यांनी सोडली लाल दहशत..

उद्रेक न्युज वृत्त :-दुर्गम भागात बऱ्याच कालावधीपासून लाल दहशतीचे सावट पसरले होते.यामुळे तेथील विकास कोसोदुर राहिला आणि अजूनही काही ठिकाणी जैसे-थे अवस्था पहावयास मिळत...

अजब रोमियोचा गजब कारनामा..! नर्सिंग कॉलेजात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला रस्त्यात गाठले अन् गालाचा घेतला मुका.. – आरोपीची तुरुंगात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपुर :-जिल्ह्याच्या भिवापूर शहरात अजब रोड रोमियोचा गजब कारनामा उघडकीस येताच पोलिसांनी अटक केल्यानंतर लागलीच त्याला भिवापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयापुढे...

दौलत कुथे ‘नाट्यश्री २०२५’ पुरस्काराने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली यांच्या वतीने आयोजित ‘महामृत्युंजय वाड्:मय स्पर्धा २०२५’ पुरस्कार वितरण सोहळा काल,रविवार ७ डिसेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!