उद्रेक न्युज वृत्त
रतन टाटांची पहिली नोकरी
देशातील उद्योगपती रतन टाटा यांनी १९६१ मध्ये टाटा स्टील जमशेदपूरमध्ये नोकरी केली होती.त्याआधी रतन टाटांनी टाटा मोटर्समध्ये नोकरी केली होती. या कंपनीत ते एक कर्मचारी म्हणून काम करत होते. ज्यावेळी टाटांनी पहिल्या नोकरीची ऑफर आली, त्यावेळी त्यांच्याकडे नोकरीसाठी बायोडाटाही तयार नव्हता.
धिरूभाई अंबानी
धिरूभाई अंबानींनी कोट्यवधींचं साम्राज्य उभारले. पण एकेकाळी ते अतिशय साधी नोकरी करीत होते.ते यमनमध्ये एका गॅस स्टेशनवर एक अटेंडेंट म्हणून नोकरी करत होते.ही त्यांची पहिली नोकरी होती.त्यावेळी त्यांना केवळ ३०० रुपये मिळत होते.काही काळात मेहनतीच्या जोरावर ते गॅस स्टेशनवर मॅनेजर झाले.त्यानंतर १९५७ मध्ये ते भारतात परतले.त्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला.हाच व्यवसाय नंतर रिलायन्स इंडस्ट्री बनला आणि २००६ मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमझ्ये धिरूभाई १३८व्या क्रमांकावर होते.
नारायणमूर्ती
भारतात IT सेक्टरचे जनक म्हणून ओळखले जाणारे इन्फोसिसचे फाउंडर नारायणमूर्ती यांची पहिली नोकरी रिसर्च असोसिएट होती.नारायणमूर्ती IIM अहमदाबादच्या एका फॅकल्टीसाठी काम करत होते.तिथेच ते चीफ सिस्टम मॅनेजर बनले.त्यानंतर त्यांनी एक सॉफ्ट्रॉनिक्स नावाची कंपनी सुरू केली.जी चालली नाही.त्यानंतर त्यांनी पुण्यात पाटणी कंप्यूटर सिस्टम्समध्ये नोकरी सुरू केली. त्यांना १० हजार रुपये वेतन मिळत होते.त्यानंतर १९८१ मध्ये त्यांनी ६ मित्रांसह इन्फोसिसची सुरुवात केली.ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ४.३ बिलियन डॉलर इतकी झाली.कंपनी सुरू करण्याचा विचार केला त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते.त्यावेळी पत्नीकडून त्यांनी काही पैसे घेऊन कंपनी सुरू केली.नारायणमूर्तींच्या घरातील एक खोली त्यांच्या कंपनीचे ऑफिस होते.
अशा प्रकारे परिस्थितीवर मात करून आज कोट्यधीश यांच्या यादीत सर्वांचे स्थान आहे.