Sunday, May 17, 2026
Homeमुंबईरतन टाटा,धीरूभाई अंबानी कोट्यवधीचे साम्राज्य उभारणारे शून्यातून आले वर

रतन टाटा,धीरूभाई अंबानी कोट्यवधीचे साम्राज्य उभारणारे शून्यातून आले वर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 मुंबई : जगभरातील अब्जाधिश आज अब्जावधी संपत्तीचे मालक आहेत.पण एक काळ असा होता;ज्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यात मोठा संघर्ष केला.अनेकांनी नोकरी करत आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

रतन टाटांची पहिली नोकरी
देशातील उद्योगपती रतन टाटा यांनी १९६१ मध्ये टाटा स्टील जमशेदपूरमध्ये नोकरी केली होती.त्याआधी रतन टाटांनी टाटा मोटर्समध्ये नोकरी केली होती. या कंपनीत ते एक कर्मचारी म्हणून काम करत होते. ज्यावेळी टाटांनी पहिल्या नोकरीची ऑफर आली, त्यावेळी त्यांच्याकडे नोकरीसाठी बायोडाटाही तयार नव्हता.

धिरूभाई अंबानी

धिरूभाई अंबानींनी कोट्यवधींचं साम्राज्य उभारले. पण एकेकाळी ते अतिशय साधी नोकरी करीत होते.ते यमनमध्ये एका गॅस स्टेशनवर एक अटेंडेंट म्हणून नोकरी करत होते.ही त्यांची पहिली नोकरी होती.त्यावेळी त्यांना केवळ ३०० रुपये मिळत होते.काही काळात मेहनतीच्या जोरावर ते गॅस स्टेशनवर मॅनेजर झाले.त्यानंतर १९५७ मध्ये ते भारतात परतले.त्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला.हाच व्यवसाय नंतर रिलायन्स इंडस्ट्री बनला आणि २००६ मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमझ्ये धिरूभाई १३८व्या क्रमांकावर होते.

नारायणमूर्ती
भारतात IT सेक्टरचे जनक म्हणून ओळखले जाणारे इन्फोसिसचे फाउंडर नारायणमूर्ती यांची पहिली नोकरी रिसर्च असोसिएट होती.नारायणमूर्ती IIM अहमदाबादच्या एका फॅकल्टीसाठी काम करत होते.तिथेच ते चीफ सिस्टम मॅनेजर बनले.त्यानंतर त्यांनी एक सॉफ्ट्रॉनिक्स नावाची कंपनी सुरू केली.जी चालली नाही.त्यानंतर त्यांनी पुण्यात पाटणी कंप्यूटर सिस्टम्समध्ये नोकरी सुरू केली. त्यांना १० हजार रुपये वेतन मिळत होते.त्यानंतर १९८१ मध्ये त्यांनी ६ मित्रांसह इन्फोसिसची सुरुवात केली.ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ४.३ बिलियन डॉलर इतकी झाली.कंपनी सुरू करण्याचा विचार केला त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते.त्यावेळी पत्नीकडून त्यांनी काही पैसे घेऊन कंपनी सुरू केली.नारायणमूर्तींच्या घरातील एक खोली त्यांच्या कंपनीचे ऑफिस होते.

अशा प्रकारे परिस्थितीवर मात करून आज कोट्यधीश यांच्या यादीत सर्वांचे स्थान आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भाजप नेत्याच्या मुलाचा मृतदेह आढळला तलावात; परिसरात तणावपूर्ण वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खापरखेडा-नांदा मार्गावरील तलावात भाजप नेते रमेश लोढे यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सचिन रमेश लोढे वय ३७ वर्षे,रा.वॉर्ड...

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त :-वाढत्या महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम केला आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे.घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीपासून...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली; परीक्षार्थींसाठी सुधारित वेळापत्रक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टिईटी-२०२६ परीक्षा आता येत्या,रविवार २८ जून २०२६ रोजी होणार...

ठाणेगाव परिसरात वणव्याचे रौद्ररूप; शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू.. – आमदार रामदास मसराम शेतबांधावर..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव परिसराच्या शेतशिवारात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण करून परिसरातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.काहींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!