Wednesday, June 24, 2026
Homeगोंदियायंदाही होणार बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात वन्यप्राण्यांची गणना..

यंदाही होणार बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात वन्यप्राण्यांची गणना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-बौद्ध पौर्णिमेच्या रात्री देशातील सर्व अभयारण्यातील वन्यजीवांची गणना केली जाते. त्यासाठी अभयारण्याच्या परिसरात वनविभागातर्फे मचाण उभारल्या जातात.त्यावर बसून वनविभागाचे कर्मचारी सर्व प्राण्यांची गणना करतात.त्यावरून जंगलात कोणत्या प्रकारचे,किती प्राणी आहेत,याची माहिती वनविभागाला मिळते.त्यानुसार,दरवर्षीप्रमाणे यंदाही गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रअंतर्गत राष्ट्रीय उद्यान नवेगावबांध येथे कोअर व बफर क्षेत्रात येत्या,शुक्रवार १ मे रोजी बौद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव-२०२६ पार पडणार आहे.यात वनविभागाचे अधिकारी कर्मचारी व निसर्गप्रेमी सहभागी होणार आहेत.त्याकरिता पूर्वतयारी झाली असल्याची माहिती राष्ट्रीय उद्यानाच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रतिभा रामटेके यांनी दिली आहे. निसर्ग अनुभव-२०२६ साठी नवेगाव राष्ट्रीय उद्यानाच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रतिभा रामटेके यांच्या मार्गदर्शनात व सूचनेनुसार नवेगाव राष्ट्रीय उद्यानात एकूण १९ मचान तयार केलेले आहेत.कोअर व राखीव क्षेत्रामध्ये १९ मचानवर,१९ वनाधिकारी-वनकर्मचारी व ३८ वन्यजीवप्रेमी असे एकूण ५७ जण स्वयंस्फूर्तीने सहभाग घेणार आहेत.दोन मचाण या निसर्ग अनुभवासाठी विशेष व्यक्तींसाठी आरक्षित ठेवलेल्या आहेत,१ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवसी दुपारी ४ वाजतापासून ते २ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.या दरम्यान वन्यप्राण्यांची नोंद करण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!