- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात १ हजार रुपयांची वाढ करण्यास आज,बुधवार ३ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यापूर्वी लाभार्थ्यांना १ हजार ५०० रूपये अर्थसहाय्य दिले जात होते.आता ते २ हजार ५०० रुपये दिले जाईल. राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत निराधार पुरुष,महिला,अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग,निराधार विधवा आदींना दरमहा दीड रुपये अर्थसहाय्य दिले जात होते.सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ४ लाख ५० हजार ७०० आणि श्रावणबाळ योजनेत २४ हजार ३ दिव्यांग लाभार्थी आहेत.या लाभार्थ्यांना आता दरमहा अडीच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यास आज बुधवारी मान्यता देण्यात आली.हे अनुदान ऑक्टोंबर २०२५ पासून देण्यात येईल.यासाठी आवश्यक ५७० कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.
- Advertisement -

