- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-कित्तेक आई-वडील काबाळकष्ट करून आपल्या मुलांची हौस पूर्ण करतात.जेणेकरून,आमचे जीवन काबाळकष्ट करून वाया तर गेलेच,किमान मुलांचे जीवन तरी सुखात जावे; अशी अनेक आई-वडिलांची इच्छा असते.त्यासाठी,हात उसनवारी,कर्ज व नाना तऱ्हेचे प्रयत्न करून मुलांना शिक्षण देत असतात.पण,काही मुला-मुलींना आई-वडिलांच्या मेहनतीची कदरच उरलेली नसल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे.आई-वडिलांनी आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी नागपूर येथील वृषाली प्रशिक्षण केंद्रात दाखल केले.दरम्यान,इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका बिहारमधील युवकाच्या प्रेमात पडून ती बिहारला पळून गेली.आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दिली, त्यानंतर नागपूर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने तिचा शोध घेऊन मुलीला नागपुरात परत आणले आहे.तिच्या आई-वडिलांनी तिचा नागपुरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वृषाली पोलीस प्रशिक्षण अकॅडमीत प्रवेश केला.प्रशिक्षण घेत असतांना ती बिहारमधील एका अकरावीच्या अल्पवयीन मुलाच्या प्रेमात पडली.दोघेही मागील आठ ते नऊ महिन्यांपासून इंस्टाग्रामवर सतत चॅटिंग करत होते. त्यानंतर अल्पवयीन मुलाने तिला बिहारला बोलावले. परंतु जाण्यासाठी पैसे नसल्याने तरुणीने आई-वडिलांना अकॅडमीमध्ये पैसे भरायचे आहे असे सांगून सात हजार रुपये मागितले.आई-वडिलांनी पैसे पाठवल्यानंतर तिने ते पैसे ॲकॅडमीत जमा न करता ती प्रयागराजला पळून गेली.प्रयागराज येथे अल्पवयीन मुलगा आला आणि दोघेही मुलाच्या गावी बिहार येथे गेले.वृषाली ॲकॅडमीतून न सांगता गेल्याची बाब तेथील प्रशासनाने तिच्या आई-वडिलांना कळवली.तिच्या आई-वडिलांनी कोराडी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती.त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या निरीक्षक ललिता तोडासे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक बिहारच्या महागामा येथे गेले आणि मुलीला सुखरूप नागपूरला परत आणल्याने आई वडिलांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
- Advertisement -

