Sunday, July 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमहिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात 'ती' काहीतरी पुटपुटली अन् चमत्कारच घडला..! -...

महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात ‘ती’ काहीतरी पुटपुटली अन् चमत्कारच घडला..! – विजयानंतर डोळ्यात अश्रू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.नवी मुंबईत काल गुरुवारी झालेल्या थरारक उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ५ गळी (फलंदाज)राखून मात केली. ऑस्ट्रेलिया संघाने दिलेले ३३९ धावांचे लक्ष्य भारताच्या संघाने ५ फलंदाजांच्या मोबदल्यात ९ चेंडू राखून पूर्ण केले.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४९ षटके आणि ५ चेंडूंत ३३८ धावा करुन माघारी परतला. फीबी लिचफील्ड हिने ११९ धावांची खेळी केली,तर किम गार्थ आणि ॲनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.प्रत्युत्तरादाखल,जेमीमा रॉडरिग्जच्या नाबाद १२७ आणि हरमनप्रीत कौर हिच्या ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दिलेले मोठे लक्ष्य भारताला पार करता आले.अश्यातच ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात अश्रू होते.हे अश्रू आनंदाचे होते,विश्वासाचे होते आणि स्वप्ने प्रत्यक्षात उतरल्याचे होते.३३९ धावांचा डोंगर गाठण्यासाठी जेव्हा भारतीय संघ मैदानावर उतरला,तेव्हा चाहत्यांना कुठेतरी वाटत होते की,ऑस्ट्रेलियासारख्या संघासमोर कदाचित हे अशक्य आहे.पण,एका बाजूला उभी असलेल्या जेमिमाला मात्र हे शक्य वाटत होते.दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत राहिल्या,पण जेमिमाचा आत्मविश्वास वाढत राहिला.जेमिमाने शतक पूर्ण केल्यानंतरही तिने कोणताही आनंद व्यक्त केला नाही, कारण तिला माहीत होते की या शतकापेक्षा भारताचा विजय महत्त्वाचा आहे.देशाचा विजय,जो संघाला फायनलमध्ये घेऊन जाईल.झालेही तसेच.जेमिमा शेवटपर्यंत क्रीझवर टिकून राहिली.तिने संयमही दाखवला आणि जोशही.अखेरीस १२७ धावांची नाबाद खेळी करून फायनलचे तिकीट मिळवलेच.सामन्यादरम्यान जेव्हा कॅमेरा जेमिमाकडे गेला,तेव्हा ती काहीतरी पुटपुटतांना ऐकू आली.ती वरच्या देवाकडे भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत होती. सामना संपल्यावर जेव्हा स्टेडियम भारत आणि जेमिमाच्या घोषणेने निनादले,तेव्हा जेमिमाच्या डोळ्यांतून अश्रू ओसंडून वाहिले.सामना जिंकल्यानंतर ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब स्वीकारतांना जेमिमा म्हणाली, ‘मी येशूचे आभार मानू इच्छिते,कारण मी हे माझ्या बळावर करू शकले नसते.मी माझ्या आई, वडील,प्रशिक्षक आणि या संपूर्ण काळात ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचे आभार मानू इच्छिते.’ ती म्हणाली की,माझे बस एकच लक्ष्य होते.भारताला हा सामना जिंकवून देणे,कारण आम्ही अनेकदा अशा परिस्थितीत हार पत्करली होती.
जेमिमा म्हणाली की,आजचा दिवस माझ्या ५० किंवा १०० धावांबद्दल नव्हता.आजचा दिवस भारताला जिंकवून देण्याबद्दल होता.मला माहीत आहे की,मला काही संधींवर नशिबाची साथ मिळाली,पण मला वाटते की प्रभूने(देवाने)सर्वकाही योग्य वेळी दिले.जेमिमा म्हणाली की,सुरुवातीला मी फक्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होते आणि स्वतःशी बोलत होते.पण शेवटी,मी… मी बायबलमधील एक ओळ पुन्हा पुन्हा म्हणत होते,कारण माझी ऊर्जा संपली होती,मी खूप थकून गेले होते.ती ओळ होती, ‘फक्त स्थिर राहा,देव तुमच्यासाठी लढेल…’ मी फक्त उभी राहिले आणि ‘प्रभू येशू’ ने माझ्यासाठी लढाई केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!