उद्रेक न्युज वृत्त
भुसावळ :-सातबारा उतार्यावर नाव चढावीण्यासाठी तीनशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भुसावळ तालुक्यातील साक्री येथील महिला तलाठी एम.एन.गायकवाड यांना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.या कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. भुसावळ तालुक्यातील साक्री येथील तलाठी एम. एन. गायकवाड यांनी सातबारा उतार्यावर नाव चढवण्यासाठी तीनशे रुपयांची लाच मागून खडका कार्यालयात स्वीकारली. आज मंगळवारी ३१ जानेवारी ला दुपारी तीनच्या सुमारास जळगाव एसीबीच्या पथकाने त्यांना सापळा रचून अटक केली आहे.हा सापळा पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील,नाईक ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला आहे.