- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
जळगाव :-जळगाव तालुक्यातील कानसवाडा शिवारातील शेतात माजी उपसरपंच युवराज कोळी यांची हत्या करण्यात आली.या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरित दोन जणांच्या मागावर पोलीस पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉमहेश्वर रेड्डी यांनी दिली. युवराज सोपान कोळी वय-३५ वर्षे, रा.भादली ता.जळगाव असे मृत उपसरपंचाचे नाव असून ते आपल्या आई-वडील,पत्नी आणि तीन मुलांसह भादली गावात वास्तव्याला होते.३१ डिसेंबर रोजी युवराज कोळी यांचा भरत पाटील,देवा पाटील, हरीश पाटील या तिघांसोबत ढाब्यावर वाद झालेला होता.त्यानंतर याच कारणावरून काल,गुरुवारी २० मार्लाच रात्री १० वाजता युवराज कोळी आणि भरत पाटील यांच्यात पुन्हा वाद झाला.हा वाद रात्री नातेवाईकांच्या मदतीने मिटवण्यात आला होता. त्यानंतर आज, शुक्रवारी २१ मार्चला सकाळी ८ वाजेच्या सुमारास युवराज हे त्यांच्या आई-वडिलांसोबत कानसवाडा शिवारातील शेतात काम करत होते.त्यावेळी संशयित आरोपी भरत पाटील आणि त्याच्यासोबत असलेले देवा पाटील,हरिश पाटील यांनी येऊन धारदार चाकू आणि चॉपरने युवराज कोळी यांच्यावर वार केले.दरम्यान छातीवर केलेल्या गंभीर जखमी झाल्याने युवराज जागेवरच कोसळले.त्यांना् वाचवण्यासाठी त्यांचे वडील सोपान कोळी आणि आई यांनी देखील धाव घेतली.परंतु देवा आणि हरीश या दोघांनी दोघांना पकडून ठेवले होते. आई-वड़िलांच्या डोळ्यासमोर मुलाचा हा खून करण्यात आला होता.परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.तोपर्यंत भरत पाटील,देवा पाटील आणि हरीश पाटील हे मारेकरी पसार झाले होते. युवराज कोळींना खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.मुलाच्या मृत्यूची वार्ता ऐकताच आई आणि वडिलांनी टाहो फोडला. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगी यांनी देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केला.
- Advertisement -

