Monday, May 18, 2026
Homeचंद्रपूरमहामोर्चाला राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचारी आझाद मैदानावर एकवठणार.......

महामोर्चाला राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचारी आझाद मैदानावर एकवठणार…….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोरपना ता. प्र/नितेश केराम

चंद्रपूर (कोरपना) :- ग्रामपंचायत कामगार सेनेच्या २० जुलै २०२३ च्या पावसाळी अधिवेशनाच्या महामोर्चाला राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आझाद मैदान येथे एकवठणार आहेत.

राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी,पेन्शन,ईपीएफ,उपदान १०% टक्केच भरती शासन स्तरावरून पारदर्शकपणे भरती करणे आधी मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदान येथील पावसाळी अधिवेशनावर मी एक ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून कितीही पाऊस आला तरी कोणते वादळ आले तरी मोर्चासाठी तयार आहे.कारण संघटना कोणतीही असो; राज्यातील राजकारणातील  ३० ते ४० वर्ष पक्षांनी वैरत्व विसरून सत्तेसाठी एका ठिकाणी येऊन,सरकार स्थापन करतात.तरी आपण आपल्या पोटासाठी आपल्या भविष्यासाठी पुढच्या पिढीसाठी व आपल्या कुटुंबासाठी एका ठिकाणी का येऊ नयेत; म्हणून मी मोर्चाला जाणार आहे.कारण कुणाच्याही भूलथापांना बळी पडणार नाही.जे कोणी काही पदाधिकारी दुसऱ्या काही संघटनेचे नेते मोर्चा बद्दल बेबनाव अफवा पसरवत आहेत.कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम काही समाजकंटक करीत आहेत.अश्याने कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे.हे लक्षात ठेवावे.तरी राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ‘मी कर्मचारी माझा कर्मचारी मी कर्मचाऱ्यांचा’ या भावनेने मुंबई येथील आजार मैदानावर दिनांक २० जुलै २०२३ रोजी  ठीक अकरा वाजता महाराष्ट्र सरकारला ६० हजार कर्मचाऱ्यांच्या संख्येने ताकद दाखवून प्रश्न सोडुन घेण्याचा व न्याय मिळण्याचा प्रयत्न करूयात.असे आवाहन विलास कुमारवार राज्य अध्यक्ष ग्रामपंचायत कामगार सेना,दयानंद एरंडे राज्य सरचिटणीस, जनार्दन मुळे राज्य कार्याध्यक्ष,अश्विनीताई मेश्राम राज्य उपाध्यक्षा,विजय उर्फ बाळू पाटील राज्य खजिनदार,नवनाथ नरवडे मराठवाडा विभागीय अध्यक्ष,हेमराज वाघाडे नागपूर विभागीय अध्यक्ष,रामेश्वर डिवरे अमरावती विभागीय अध्यक्ष यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!