Sunday, July 26, 2026
Homeचंद्रपूरमहामोर्चाला राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचारी आझाद मैदानावर एकवठणार.......

महामोर्चाला राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचारी आझाद मैदानावर एकवठणार…….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोरपना ता. प्र/नितेश केराम

चंद्रपूर (कोरपना) :- ग्रामपंचायत कामगार सेनेच्या २० जुलै २०२३ च्या पावसाळी अधिवेशनाच्या महामोर्चाला राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आझाद मैदान येथे एकवठणार आहेत.

राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी,पेन्शन,ईपीएफ,उपदान १०% टक्केच भरती शासन स्तरावरून पारदर्शकपणे भरती करणे आधी मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदान येथील पावसाळी अधिवेशनावर मी एक ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून कितीही पाऊस आला तरी कोणते वादळ आले तरी मोर्चासाठी तयार आहे.कारण संघटना कोणतीही असो; राज्यातील राजकारणातील  ३० ते ४० वर्ष पक्षांनी वैरत्व विसरून सत्तेसाठी एका ठिकाणी येऊन,सरकार स्थापन करतात.तरी आपण आपल्या पोटासाठी आपल्या भविष्यासाठी पुढच्या पिढीसाठी व आपल्या कुटुंबासाठी एका ठिकाणी का येऊ नयेत; म्हणून मी मोर्चाला जाणार आहे.कारण कुणाच्याही भूलथापांना बळी पडणार नाही.जे कोणी काही पदाधिकारी दुसऱ्या काही संघटनेचे नेते मोर्चा बद्दल बेबनाव अफवा पसरवत आहेत.कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम काही समाजकंटक करीत आहेत.अश्याने कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे.हे लक्षात ठेवावे.तरी राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ‘मी कर्मचारी माझा कर्मचारी मी कर्मचाऱ्यांचा’ या भावनेने मुंबई येथील आजार मैदानावर दिनांक २० जुलै २०२३ रोजी  ठीक अकरा वाजता महाराष्ट्र सरकारला ६० हजार कर्मचाऱ्यांच्या संख्येने ताकद दाखवून प्रश्न सोडुन घेण्याचा व न्याय मिळण्याचा प्रयत्न करूयात.असे आवाहन विलास कुमारवार राज्य अध्यक्ष ग्रामपंचायत कामगार सेना,दयानंद एरंडे राज्य सरचिटणीस, जनार्दन मुळे राज्य कार्याध्यक्ष,अश्विनीताई मेश्राम राज्य उपाध्यक्षा,विजय उर्फ बाळू पाटील राज्य खजिनदार,नवनाथ नरवडे मराठवाडा विभागीय अध्यक्ष,हेमराज वाघाडे नागपूर विभागीय अध्यक्ष,रामेश्वर डिवरे अमरावती विभागीय अध्यक्ष यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!