- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एखादा पत्रकार असो वा शैक्षणिक परिषद,मनात आले तर काहीही छापू शकत नाही. त्यास काही मर्यादा असते.मात्र,राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच एनसीईआरटी(NCERT-National Council of Educational Research and Training)ने इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात “न्यायपालिकेतील भ्रष्टाचार” असा उल्लेख केल्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून फटकारताच बिनशर्त माफी मागावी लागली आहे.प्रकरणी एनसीईआरटीने सुधारित मजकूरासह पुस्तकाची नवीन आवृत्ती पुढील शैक्षणिक सत्र २०२६-२७ च्या सुरुवातीला इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाईल,अशी माहिती एनसीईआरटी कडून न्यायालयात देण्यात आली.
इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातील एका प्रकरणात न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा उल्लेख करण्यात आला होता.शालेय स्तरावर न्यायपालिकेबद्दल अशा प्रकारचा मजकूर प्रकाशित झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने याची स्वतःहून दखल घेतली.या प्रकरणावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून स्पष्टीकरण मागितले.सर्वोच्च न्यायालयाच्या फटकारानंतर एनसीईआरटीने न्यायालयाची बिनशर्त माफी मागत हा मजकूर हेतुपुरस्सर समाविष्ट करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले.संस्थेने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक संस्थांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता.मात्र,त्यामधील काही मजकूर चुकीच्या पद्धतीने मांडला गेला असल्याचे स्वतः एनसीईआरटीने मान्य करून याबाबत न्यायालयात माफी मागितली.
- Advertisement -

