Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीबालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. - ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या दिवशी कुठल्याही प्रकारचा बालविवाह झाल्यास संबंधितांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या आहेत.
बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने सविस्तर ॲक्शन प्लॅन तयार केला असून ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तसेच शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ)यांना बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.या अधिकाऱ्यांकडून संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
बालविवाहात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये विवाह सोहळ्यात सेवा देणारे पंडित,धार्मिक गुरु,मंडप मालक,फोटोग्राफर,केटरिंग व्यवसायिक, लॉन्स मालक तसेच वाजंत्री यांचा समावेश असून, बालविवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या कक्षेत आणले जाईल,असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
अक्षयतृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा शुभ मुहूर्त मानला जातो.या दिवशी मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे पार पडत असल्याने काही ठिकाणी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता असते.याची दखल घेत प्रशासनाने या वर्षी विशेष खबरदारी घेतली असून जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये,यासाठी सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.
बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून,कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ किंवा आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.प्राप्त माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असून त्वरित कारवाई केली जाईल.
दरम्यान,मागील सहा वर्षांत राज्यात प्रशासनाने ५ हजार ४२१ बालविवाह थांबवले असून ४०१ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाने आतापर्यंत १७ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असून बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील कलम १६(१)नुसार संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली आहे.जिल्ह्यात बालविवाहमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून नागरिकांनीही या सामाजिक प्रश्नाविरुद्ध सजग राहून सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!