Monday, December 15, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तबारा नक्षल्यांचा खात्मा तर तीन जवान शहीद..

बारा नक्षल्यांचा खात्मा तर तीन जवान शहीद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छतीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील गंगलूर पोलिस स्टेशन हद्दीतील घनदाट जंगल परिसरात आज,बुधवार ३ डिसेंबरला सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत बारा नक्षलवाद्यांचा खात्मा तर तीन जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांचे बाराही मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.चकमकीच्या ठिकाणाहून एसएलआर रायफल,३०३ रायफल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.त्याचबरोबर,मृत नक्षलिंचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आज बुधवारी जिल्हा राखीव पोलीस दल,केंद्रीय राखीव पोलीस दलासह इतर सुरक्षा दलांचे संयुक्त पथक गंगलूरच्या जंगल परिसरात शोधमोहीम राबवत होते.यादरम्यान,नक्षलींनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला.याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले.आज सकाळपासूनच चकमक सुरू होती.गंगलूर हा नक्षलवादाच्या दृष्टीने संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो.परिसरात नक्षली कमांडर पापा रावचे वर्चस्व असल्याचे बोलल्या जाते.चकमकीत सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झाले आहेत.तिन्ही जवान जिल्हा राखीव पोलीस दलात कार्यरत होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!