- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-तेंदूपत्ता संकलन हा सर्वसामान्य नागरिक,गोर-गरीब लोकांसाठी उदरनिर्वाह,शेतीसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चासाठी मदत करणारा व काही आर्थिक संकट दूर करणारा महत्त्वाचा रोजगार आहे.तेंदुपत्ता संकलन करणारे मजूर हे पहाटेपासून तर सायंकाळपर्यंत उन्हा-तानाचे चटके घेत,जीव मुठीत घेऊन व जंगलातील हिंस्र पशुंपासून संरक्षण करीत या रानातून त्या रानात वन-वन फिरून तेंदूचा एक एक पत्ता तोडत आपल्या ओझ्याची भरती करून प्रत्येकजण चार पैशांसाठी जुळवाजुळव करतांना दिसून येतात.उन्हाळ्याची चाहूल लागताच शेतकरी असो की कष्टकरी मजूर तेंदुपत्ता संकलनासाठी सज्ज होतात.दरवर्षी तेंदुपत्ता संकलनाला मिळणारा भाव आणि बोनस तेंदूपत्ता कामगारांचे काही प्रमाणात आर्थिक संकट दुर करून जाते.परंतु दरवर्षी बदलत्या वातावरणामुळे तेंदुपत्ता संकलन कमी होत असून,पंधरा दिवस चालणारा सीजन चार ते पाच दिवसांतच बंद पडू लागल्याने तेंदूपत्ता कामगारांवर आर्थिक अडचणी ओढावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मजुरांच्या हाताला काम मिळायचा व दोन पैसे गोळा व्हायचे,तर अस्मानी संकट आणि बदलते वातावरण आता गोर-गरीबांचे रोजगार हिरावू लागला आहे.
- Advertisement -

