Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीप्रा.मुनिश्वर बोरकर यांची पुनश्च एकदा RPI च्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निवड..

प्रा.मुनिश्वर बोरकर यांची पुनश्च एकदा RPI च्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निवड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-वंचित,शोषित,पीडितांच्या मदतीसाठी तात्काळ धावून जाणारे व अन्यायाविरुद्ध आंदोलने उभारून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे प्रा.मुनिश्वर बोरकर यांची पुनश्च एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या(RPI)गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य निवडणुक अधिकारी डॉ.गौतम गोसावी,मुंबई यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले प्रा.बोरकर यांच्या निवडीमुळे पक्षाला बळकटी येईल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.बोरकर यांच्या निवडीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील संघटनास बळकटी येणार आहे.यापूर्वीही प्रा.मुनिश्वर बोरकर हे गडचिरोली जिल्ह्याच्या रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी होते.संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय असल्यानेच त्यांची पुनश्च एकदा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी त्यांच्या निवडीचे श्रेय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणिस डॉ.राजेंद्र गवई,प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे,गडचिरोलीचे माजी जि.प.सदस्य ॲड.राम मेश्राम तथा आरपिआय नेते गोपाल रायपुरे यांचेसह संपूर्ण जिल्हावासिय कार्यकर्त्यांना दिले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!