- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पुण्यातील जमीन घोटाळा उघडकीस येताच अनेकांच्या उंचावणाऱ्या भुवया खाली गळून पडल्या.त्याचे कारणही तसेच आहे; भ्रष्ट अधिकाऱ्याची साथ असल्यास या दुनियेत कुठलीही गोष्ट अशक्य नाही,हे पुन्हा एकदा नाहीतर अनेकवेळा सिध्द होणारी बाब आहे; असे म्हणत आम आदमी पक्षाचे नेते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पुण्याच्या बोपोडी जमीन घोटाळ्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या कथित भ्रष्ट कारभारावरून सोशल मीडियावर करून कहाणी उघड करून सरकार व राजकारण्यांना खडेबोल सुनावले आहे.पुण्याच्या बोपोडी येथील सरकारी दूध डेअरीच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणी त्यांच्यासह इतर सहा जणांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे विशेष.या पार्श्वभूमीवर आदमी पक्षाचे नेते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी त्यांच्या ‘एक्स'(ट्विटर) अकाऊंटवर म्हटले की,पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या निमित्ताने पुन्हा सिद्ध झालं की अधिकारी जितका भ्रष्ट,तितका तो राजकारण्यांचा लाडका.अशा माणसाला नागपूरहून पुण्यात कुणी आणि का आणलं? इतके गंभीर आरोप असूनही त्याला कार्यकारी पद का देण्यात आलं? त्याच्यामागे कोणाचं राजकीय छत्र आहे?.
सर्वोच्च न्यायालयाने अशा पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा होऊ नये,राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांमधे नागरी सेवा मंडळ नावाची यंत्रणा स्थापन करणे बंधनकारक केले आहे.ती यंत्रणा येवले प्रकरणात काय करत होती? की त्या यंत्रणेला डावलून येवलेंची बदली केली? केली असेल कोणी केली ?नागरी सेवा मंडळाने शिफारस केली असेल तर त्यांच्या सदस्यांवर कोण आणि कधी कारवाई करणार?
येवलेंचे काही पराक्रम पुढील प्रमाणे..
येवले यांनी २००१ मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली. ३६१ गुण आणि अपंग(कर्णबधिर) कोट्यातून पास झाल्याने त्यांना नागपूर विभागात २००४ मध्ये नायब तहसीलदार पद देण्यात आले.पण खरंच कर्णबधिर आहेत का? नसतील तर हे थेट महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरण ठरेल ! त्याआधी येवलेंनी सर्वसाधारण गटातून परीक्षा दिली होती असे म्हणतात.२००१ चा MPSC घोटाळा गाजला होता. ३९८ उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलल्या, प्रत्येकाकडून ₹३-३५ लाख घेतल्याचे आरोप झाल्यानंतर मुंबई HC ने सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या.आता ज्याची सेवेत रुजू होतानाची कारकीर्द अशी असेल त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा कशी करता येईल ?
येवले यांना २०११ मध्ये उमरेड (नागपूर)येथे ₹१०,००० ची लाच घेताना पकडले.६ दोषारोपपत्रं ठेवण्यात आली, पण चौकशीचा पत्ता नाही.
त्यानंतर गडचिरोलीला हजर न राहिल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं पण सेटिंग लावून परत रुजू झाले.
२०१४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सिरोंचा कोतवाल भरती प्रकरणात प्रत्येकाकडून ₹२-₹२.५ लाख लाच घेतल्याचा आरोप . हा प्रकार कानावर येताच नक्षलवाद्यांनी अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही असे जाहिर केले.
२०१६ मध्ये पुणे विभागात बदली. पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी-मंत्रालयातून “सेटिंग” करून पोस्टिंग.
२०१६ मध्येच इंदापूर तहसीलदार म्हणून रुजू ५८ सरकारी जमिनींचं अनियमित वाटप, वाळूमाफियाकडून संगनमत यामुळे जिल्हाधिकारी पुणे यांनी निलंबन केलं.
१४ वर्षांत ७ वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप,पण प्रत्येक वेळी “सेटिंग” लावून बचाव !
मोबोज हॉटेल जमीन घोटाळा प्रकरणी त्यांच्याविरुद्ध आरोप करण्यात आले,आंदोलने झाली परंतु पुढे काहीच झाले नाही.
येवले “मुंढवा जमीन घोटाळा” प्रकरणात अमेडिया कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी प्रचंड सक्रिय होते.

- Advertisement -

