Saturday, May 2, 2026
Homeमुंबईन्यायव्यवस्थेबद्दल वादग्रस्त विधान; वकिलाची सनद रद्द..!

न्यायव्यवस्थेबद्दल वादग्रस्त विधान; वकिलाची सनद रद्द..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी आज,सोमवार ३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध वकील ॲड.असीम सरोदे यांची
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने वकिलीची सनद तब्बल तीन महिन्यांसाठी रद्द केली आहे.त्यातच, त्यांच्यावर २५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.पुढील तीन महिने सरोदे यांना कुठल्याही न्यायालयात युक्तिवाद करता येणार नाही.ॲड.सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीत सहभागी होते.मात्र,बार कौन्सिलने घेतलेल्या निर्णयामुळे खटल्याच्या पुढील प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या वरळी येथील एका आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात ॲड.सरोदे यांनी न्यायव्यवस्था,राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह विधाने केली होती.या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला असून न्यायालयांविषयी नागरिकांमध्ये अविश्वास निर्माण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.या प्रकरणी १९ मार्च २०२४ रोजी बार कौन्सिलकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती.त्यानंतर ॲड.विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने या तक्रारीची दखल घेत सखोल चौकशी केली.विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने असीम सरोदे यांच्या भाषणाचे ट्रान्सक्रिप्ट आणि व्हिडिओ क्लिप बघितल्या असता असीम सरोदे हे व्हिडिओमध्ये “राज्यपाल फालतू आहेत” व “न्यायालय सरकारच्या दबावाखाली काम करत आहे”.असे वक्तव्य करतांना आढळून आले.प्रकरणी बार कौन्सिलने ॲड.असीम सरोदे यांना आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लेखी माफी मागण्याची संधी देण्यात आली होती.मात्र, त्यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता.त्यामुळे सदरची कारवाई करण्यात आली.बार कौन्सिलने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे वकीलांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!