- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-सर्वत्र धूमधडाक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जात असतांनाच चंद्रपूर शहरात जयंती दिनीच गालबोट लागल्याची घटना उघडकीस आली आहे.मिरवणुकीदरम्यान झालेल्या किरकोळ वादातून एका ३६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली.तर एकजण जखमी झाल्याची घटना काल,मंगळवार १४ एप्रिलच्या रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहराच्या गांधी चौकात घडली.रविकांत टेम्बुलकर वय ३६ वर्षे असे मृत तरुणाचे नाव असून तो शहरातील इंदिरा नगर परिसरात वास्तव्यास होता.या घटनेत अनिकेत गलबले हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काल मंगळवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चंद्रपूर शहरात सकाळपासून विविध विहारातून तसेच प्रभागातून भव्य रॅली काढण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला.अभिवादन करून ही रॅली वॉर्डात निघून जात होती.जयंती दिनी बाबासाहेबाना मानवंदना देण्यासाठी हजारो अनुयायी रॅलीमध्ये सहभागी झाले होते.डिजेच्या तालावर या रॅली विविध भागातून येत होत्या. रात्री साडे अकरा वाजता इंदिरानगर मधील भीमरत्न बहुद्देशीय युवा संस्था तर्फे गांधी चौकात रॅली पोहोचल्यावर डीजेच्या तालावर नाचतांना तरुणांमध्ये धक्काबुक्की झाली.यात काही तरुण चवताळले आणि त्यांनी वाद घालत काही तरुणांना मारहाण केली.तेवढ्यात वाद सोडवण्यासाठी रविकांत टेम्बुरकर हा धावून समोर गेला.त्याने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता काही तरुणांनी रविकांतवर चाकूने सपासप वार केले.उपस्थित नागरिकांनी रविकांतला जखमी अवस्थेत उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले.पण,तिथेच त्याचा मृत्यू झाला.प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
- Advertisement -

