Monday, May 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. - सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण लहर सुरू आहे.परत हवामान खात्याने काही ठिकाणी काल रविवारसह आज सोमवारीही उष्ण लहरींचा इशारा दिला आहे.विशेष म्हणजे,रविवारी विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी येथे नोंदविण्यात आली.सर्व रेकॉर्ड मोडीत काढून ब्रम्हपुरी येथे ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.तर चंद्रपूर ४५.६,वर्धा ४५.५,नागपूर ४५.४, अमरावती व गडचिरोली ४५.२,गोंदिया ४५,भंडारा ४४.८,अकोला व वाशिम ४३.४,यवतमाळ ४२.८ व बुलढाणा ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाने उकाडा वाढला.अश्यातच आता आज,सोमवार २५ मे पासून नवतपाला सुरुवात झाली आहे.नवतपा म्हणजे नऊ दिवसांचा काळ म्हणजेच २५ मे ते २ जून २०२६ पर्यंत,या नऊ दिवसांत उन्हाळ्यातील सर्वाधिक ऊन तापते, उन्हाळ्याच्या चार महिन्यांतील उन्हाची कसर या नऊ दिवसांत भरून निघते,असे म्हटले जाते.नवतपामुळे सूर्याची दाहकता आणखी वाढत असते.कडक उन्हात घराबाहेर पडणे जीवघेणेच ठरत असून,कष्टकरी लोकांना मात्र कामासाठी बाहेर पडावेच लागते.म्हणून उन्हाळ्याचे चार महिने लवकरात लवकर संपावेत,अशी कामना सर्व करतात.त्यातही मे महिन्यातील ऊन म्हणजे अंगाला भाजून काढणारे असते.घराबाहेर पडताच अंगाची लाहीलाही करणारे ऊन पडत असल्याने कधी-कधी आपले घर गाठावे,अशीच सगळ्यांची इच्छा असते. त्यामुळे नागरिकांनी जीवाची काळजी घेणे व दुपारी घराबाहेर पडणे टाळावे,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!