- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर शहरातील दंगलीबाबत ॲक्शन मोडवर आले असून आज,शनिवारी २२ मार्चला नागपुरात पत्रकार परिषद घेत सोमवारी १७ मार्चला
औरंगजेबाच्या कबरीवरुन नागपूरमध्ये आंदोलकांकडून प्रतिकात्मक कबर जाळत असतांना आयत लिहिलेली चादर जाळल्याचा अपप्रचार काही लोकांनी केला.यानंतर जमाव गोळा करून त्यांनी लोकांवर दगडफेक करून जाळपोळ केली.पोलिसांवर हल्ला केला.पोलिसांनी लाठीचार्ज,अश्रू नळकांड्या अशा प्रतिकात्मक गोष्टी केल्या.यातील सीसीटीव्ही फुटेज,खासगी चित्रिकरण पोलिसांकडे देण्यात आले असून यातून आरोपींची ओळख पटवली जात असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस म्हणाले.ज्यांची वाहने जाळण्यात आली,अश्यांना येत्या तीन ते चार दिवसांत नुकसानभरपाई दिली जाणार आहे.आपण काही निर्बंध घालणार आहोत, त्याचा जनजीवनावर व व्यापारावर परिणाम होणार असल्याने त्यात शिथिलता आणली जाईल.पोलीस सजग आहेत.आता झालेले नुकसान दंगेखोरांकडून वसूल केले जाईल,दंगेखोरांनी पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल,असे फडणवीसांनी म्हटले.दंगेखोरांना सरळ केले नाही तर त्यांना तशी सवय पडेल.त्यामुळे दंगेखोरांना धडा शिकवणे आवश्यक आहे.याप्रकरणी कुणालाही सोडणार नाही,असेही फडणवीस म्हणाले.
- Advertisement -