Friday, November 7, 2025
Homeनागपूरनागपूर आणि चंद्रपूर येथे पहिल्यांदाच सुरू होणार वन औद्योगिक विकास महामंडळ - सुधीर...

नागपूर आणि चंद्रपूर येथे पहिल्यांदाच सुरू होणार वन औद्योगिक विकास महामंडळ – सुधीर मुनगंटीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- राज्यात पहिल्यांदाच नागपूर आणि चंद्रपूर येथे वन औद्योगिक विकास महामंडळ(एफआयडीसी) सुरू करण्यात येईल,अशी माहिती राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.९ मार्च रोजी सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात या संबंधात घोषणा केली जाणार असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

राज्यात वन आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.टुथ पिक,अगरबत्तीसाठी लागणारी काडी याशिवाय फर्निचरसाठी लागणारे लाकूडही आपण आयात करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा दिला आहे. त्या दिशेने एक पाऊल म्हणून एफआयडीसी सुरू करणार आहोत.आर्थिक आणि औद्योगिक विकासात भर घालणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धर्तीवर हे महामंडळ सुरू करण्यात येणार आहे.

उपजीविकेसाठी कृषी,वन आणि जल विभाग हे महत्वाचे आहे.मासेमारी आणि वनविभागावर उपजीविका चालते.नागपूर हे देशाच्या मध्यभागी आहे.वनविकास महामंडळ आणि वनविभाग मिळून दरवर्षी ६०० ते ७०० कोटी रुपयांची सागवान लाकडाची विक्री होते.त्याऐवजी तयार फर्निचर विकले जाईल.नागपूर येथे फर्निचरचे तर चंद्रपूर येथे वनौषधींचे सुविधा केंद्र (काॅमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्यात येणार आहे.या केंद्रांमध्ये नाममात्र दरात उद्योजकांना सुविधा देण्यात येईल व यासाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रे खरेदी करण्यात येणार आहे.पर्यावरणावर आधारित औद्योगिक क्षेत्राकडे वळण्याची आज गरज आहे.वनौषधी आणि वनाधारित छोटे उद्योगाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.वनाधारित समूह चंद्रपूर येथे असेल. चंद्रपूर आणि गडचिराेली जिल्ह्यात वनौषधीचा खजीना आहे.यासाठी आम्ही वैद्यनाथ,पतंजली,सांडू, डाबर यांच्याशी भागीदारी करणार आहोत.त्याचे प्रशिक्षण आदीवासी शेतकऱ्यांना देण्यात येईल ज्यातून त्यांनाही रोजगार मिळेल असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १ हजार ९७२ शाळांमध्ये निनादले ‘वंदे मातरम्’ चे सूर अन् देशभक्तीची लहर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.जिल्ह्यातील सर्व...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२...

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण...

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत 'वंदे मातरम' ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!