Wednesday, June 24, 2026
Homeनागपूरनागपुरात भिक मागणारे व तृतीयपंथीयांद्वारे पैसे मागणाऱ्यांवर आजपासून बंदी

नागपुरात भिक मागणारे व तृतीयपंथीयांद्वारे पैसे मागणाऱ्यांवर आजपासून बंदी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- नागपुरात अनेक चौकांमध्ये वाहनचालकांकडून भीक मागण्याचे प्रकार वाढल्याच्या अनेक तक्रारी आहेत.त्यामुळे पोलिसांनी शहरात कलम १४४ अन्वये रस्त्यांवर,चौकात,ट्रॅफिक सिग्नल्सवर थांबून भिकाऱ्यांच्या भीक मागण्यावर तसेच तृतीयपंथीयांद्वारे वाहनचालकांकडून पैसे मागण्यावर बंदी घातली आहे.या आदेशाची आजपासून ९ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत अंमलबजावणी होणार आहे.या बंदी आदेशांचे उल्लंघन केल्यास आयपीसी कलम १८८ अन्वये संबंधित व्यक्तीच्या विरोधात फौजदारी कारवाई केली जाईल; असा इशारा नागपूर पोलिसांनी दिला आहे.नागपुरात २१ मार्चपासून जी-२० च्या बैठकांचे आयोजन होत असून परदेशी पाहुण्यांपुढे वास्तव दर्शक चित्र जाऊ नये, यासाठी पोलिसांमार्फत हे परिपत्रक काढण्यात आल्याची चर्चा जोरात आहे.

राज्याची उपराजधानी नागपुरात रस्त्यांवर चौकांवर ट्रॅफिक सिग्नल्सवर भिकारी तसेच तृतीयपंथीयांद्वारे वाहन चालकाकडून पैसे मागण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यात वाढले होते.विशेषतः पंचशील चौक,शंकर नगर चौक,व्हेरायटी चौक,रेशीमबाग चौक तसेच छत्रपती चौकात तृतीयपंथीयांकडून दमदाटीचे प्रकार मोठ्या संख्येने घडत आहेत.याविषयी तक्रारी देखील झाल्या.पंचशील चौकात उड्डाणपुलाच्या आडोश्याने तसेच यशवंत स्टेडिअमपुढे मुक्काम ठोकणाऱ्या भिकाऱ्यांवर अनेकदा कारवाई झाली.मात्र,काही दिवसानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ दिसत असल्याचा अनुभव नागपूरकरांना नेहमीच येतो.आता पोलिसांनी या प्रकारांवर ३० एप्रिलपर्यंत बंदी घातली आहे. २१ मार्चपासून शहरात जी-२० च्या उपसमितीची बैठक होत आहे.त्यासाठी २१,२२ आणि २३ मार्च रोजी सुमारे २०० परदेशी पाहुणे नागपुरात आहेत. नागपूरबद्धल चुकीचे चित्र उभे राहू नये; या दृष्टिने हे बंदी आदेश लागू केल्याची चर्चा आहे.दुसरीकडे रस्त्यांवर भिकाऱ्यांकडून तसेच तृतीयपंथीयांकडून वाहनचालकांना होणारा त्रास कमी व्हावा; यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची देखील मागणी होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!